शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

योजनांतील अनुदानामध्ये सापत्नभाव; विहिरींचे लाभार्थी घटले! गरीब शेतकरी लाभापासून वंचीत

By विजय सरवदे | Updated: December 22, 2023 13:31 IST

या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे, हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे.

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच ‘मनरेगा’च्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते, तर दुसरीकडे जि. प. कृषी विभागामार्फतच्या विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान आणि दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाची अट असल्यामुळे या योजनेच्या लाभार्थींमध्ये घट होत आहे.

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनांतर्गत नवीन विहीर बांधणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, जुनी विहीर असलेल्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी १० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २५ हजार रुपये, ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपये, स्प्रिंकल सिंचन संचासाठी २५ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावे, ही अट आहे. दरम्यान, सिंचन विहिरीसाठी ४ लाखांचे अर्थसहाय मिळते आणि त्यासाठी उत्पन्नाची अटही नाही. या कारणामुळे या दोन्हीही योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.

यासंदर्भात कार्यालयीन सुत्रांनी सांगितले की, या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे, हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. दरवर्षी, या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच अनुसूचित जमातीचे शेतकरी ऑनलाइन अर्ज करतात. सोडत पद्धतीने लाभार्थी निवडलेही जातात. पण, प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी हे शेतकरी पुढे येत नाहीत. विहीर खोदण्यासाठी अडीच लाखांचे अनुदान पुरत नाही. एक तर थोडीसी जमीन, त्यात अर्धवट विहीर खोदून ‘असून अडचण नसून खोळंबा, अशी गत होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

साडेपाचशे विहिरींचे उद्दिष्टयंदा चालू आर्थिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांतर्गत ५८५ विहिरींचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आतापर्यंत ८१० लाभार्थींची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. सोडत पद्धतीने निवडलेले सर्वच लाभार्थी विहीर खोदण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे जास्तीच्या लाभार्थ्यांची निवड करावी लागते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना २ वर्षांत विहीर खोदण्याची मुदत आहे.- प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र