शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

योजनांतील अनुदानामध्ये सापत्नभाव; विहिरींचे लाभार्थी घटले! गरीब शेतकरी लाभापासून वंचीत

By विजय सरवदे | Updated: December 22, 2023 13:31 IST

या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे, हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे.

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच ‘मनरेगा’च्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते, तर दुसरीकडे जि. प. कृषी विभागामार्फतच्या विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान आणि दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाची अट असल्यामुळे या योजनेच्या लाभार्थींमध्ये घट होत आहे.

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनांतर्गत नवीन विहीर बांधणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, जुनी विहीर असलेल्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी १० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २५ हजार रुपये, ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपये, स्प्रिंकल सिंचन संचासाठी २५ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावे, ही अट आहे. दरम्यान, सिंचन विहिरीसाठी ४ लाखांचे अर्थसहाय मिळते आणि त्यासाठी उत्पन्नाची अटही नाही. या कारणामुळे या दोन्हीही योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.

यासंदर्भात कार्यालयीन सुत्रांनी सांगितले की, या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे, हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. दरवर्षी, या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच अनुसूचित जमातीचे शेतकरी ऑनलाइन अर्ज करतात. सोडत पद्धतीने लाभार्थी निवडलेही जातात. पण, प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी हे शेतकरी पुढे येत नाहीत. विहीर खोदण्यासाठी अडीच लाखांचे अनुदान पुरत नाही. एक तर थोडीसी जमीन, त्यात अर्धवट विहीर खोदून ‘असून अडचण नसून खोळंबा, अशी गत होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

साडेपाचशे विहिरींचे उद्दिष्टयंदा चालू आर्थिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांतर्गत ५८५ विहिरींचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आतापर्यंत ८१० लाभार्थींची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. सोडत पद्धतीने निवडलेले सर्वच लाभार्थी विहीर खोदण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे जास्तीच्या लाभार्थ्यांची निवड करावी लागते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना २ वर्षांत विहीर खोदण्याची मुदत आहे.- प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र