शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वर्ग-२ जमीन विक्री चौकशीचा अहवाल आयुुक्तांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:48 IST

सिलिंग, वर्ग-२ जमिनींच्या विक्रीचे परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अहवालानुसार समितीसोबत चर्चा करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिलिंग, वर्ग-२ जमिनींच्या विक्रीचे परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अहवालानुसार समितीसोबत चर्चा करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे, तो पाहिला नाही. येत्या आठवड्यात चौकशी समितीमधील सदस्यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जमीन विक्रीमध्ये २७५ प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. कमाल जमीन कायद्यांतर्गत ताब्यात घेतलेल्या सिलिंगच्या जमिनी कसण्यासाठी दिल्या जातात. या जमिनी वर्ग-२ मध्ये मोडतात. या जमिनींच्या व्यवहारासाठी जिल्हाधिकाºयांची परवानगी घ्यावी लागते. जिल्हाधिकाºयांचे अधिकार वापरून उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी वर्ग-२ च्या जमीन विक्री करण्याची परवानगी दिल्याची तक्रार विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांच्याकडे केली होती. त्यावरून आयुक्तांनी चौकशी समिती गठित केली. चौकशी समितीने याप्रकरणी अहवाल विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शेषराव सावरगावकर, महेश परंडेकर, अरुण पावडे, मुकुंद गिरी, आशुतोष पैठणकर यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे.औरंगाबादप्रमाणे विभागातील इतर व्यवहारही तपासण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तविली होती. मात्र, औरंगाबादमधील प्रकरणात खरंच अनियमितता झाली आहे का? हेच अजून समोर आलेले नाही. अहवाल उघडल्यानंतरच सत्य समोर येईल.अधिकार विभाजनामुळेसंशयकल्लोळ२००६ पर्यंत उपजिल्हाधिकारी भूसुधार वर्ग-२ प्रकरणात निर्णय घ्यायचे. २००६ नंतर या पदाचे रुपांतर उपजिल्हाधिकारी महसूल तथा सामान्य प्रशासन असे करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकाºयांना भूसुधार करण्याचे स्वतंत्र अधिकार नाहीत. त्यांनी काही परवानग्या दिल्या असतील, तर त्यांची अडचण वाढेल. तसेच उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांना वाटप केलेल्या विषयानुसार अधिकार आहेत. उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकाºयांचे अधिकार आपल्या कार्यक्षेत्रात वापरू शकतात. २००६ नंतर निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्यातील कामकाजाचे वाटप करण्यात आले. शासनाने हे भूसुधारचे अधिकार देण्यापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त के. बी. भोगे यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. त्यांनी खाते विभाजन करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर राज्यभरात सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकाºयांकडे भूसुधारचे अधिकार देण्याचा पॅटर्न लागू करण्यात आला. परंतु अधिकार विभाजनाचे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाला आजवर प्राप्त झालेले नाहीत. यावरूनच सगळा संशयकल्लोळ सुरू आहे.