शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वर्ग-२ जमीन विक्री चौकशीचा अहवाल आयुुक्तांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:48 IST

सिलिंग, वर्ग-२ जमिनींच्या विक्रीचे परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अहवालानुसार समितीसोबत चर्चा करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिलिंग, वर्ग-२ जमिनींच्या विक्रीचे परवानगी आदेश देताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अहवालानुसार समितीसोबत चर्चा करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे, तो पाहिला नाही. येत्या आठवड्यात चौकशी समितीमधील सदस्यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जमीन विक्रीमध्ये २७५ प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. कमाल जमीन कायद्यांतर्गत ताब्यात घेतलेल्या सिलिंगच्या जमिनी कसण्यासाठी दिल्या जातात. या जमिनी वर्ग-२ मध्ये मोडतात. या जमिनींच्या व्यवहारासाठी जिल्हाधिकाºयांची परवानगी घ्यावी लागते. जिल्हाधिकाºयांचे अधिकार वापरून उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी वर्ग-२ च्या जमीन विक्री करण्याची परवानगी दिल्याची तक्रार विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांच्याकडे केली होती. त्यावरून आयुक्तांनी चौकशी समिती गठित केली. चौकशी समितीने याप्रकरणी अहवाल विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शेषराव सावरगावकर, महेश परंडेकर, अरुण पावडे, मुकुंद गिरी, आशुतोष पैठणकर यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे.औरंगाबादप्रमाणे विभागातील इतर व्यवहारही तपासण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तविली होती. मात्र, औरंगाबादमधील प्रकरणात खरंच अनियमितता झाली आहे का? हेच अजून समोर आलेले नाही. अहवाल उघडल्यानंतरच सत्य समोर येईल.अधिकार विभाजनामुळेसंशयकल्लोळ२००६ पर्यंत उपजिल्हाधिकारी भूसुधार वर्ग-२ प्रकरणात निर्णय घ्यायचे. २००६ नंतर या पदाचे रुपांतर उपजिल्हाधिकारी महसूल तथा सामान्य प्रशासन असे करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकाºयांना भूसुधार करण्याचे स्वतंत्र अधिकार नाहीत. त्यांनी काही परवानग्या दिल्या असतील, तर त्यांची अडचण वाढेल. तसेच उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांना वाटप केलेल्या विषयानुसार अधिकार आहेत. उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकाºयांचे अधिकार आपल्या कार्यक्षेत्रात वापरू शकतात. २००६ नंतर निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्यातील कामकाजाचे वाटप करण्यात आले. शासनाने हे भूसुधारचे अधिकार देण्यापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त के. बी. भोगे यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. त्यांनी खाते विभाजन करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर राज्यभरात सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकाºयांकडे भूसुधारचे अधिकार देण्याचा पॅटर्न लागू करण्यात आला. परंतु अधिकार विभाजनाचे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाला आजवर प्राप्त झालेले नाहीत. यावरूनच सगळा संशयकल्लोळ सुरू आहे.