शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

विषय शिक्षकांवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST

जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले.

जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान शिक्षण विभागासाठी मोठा प्रश्न आहे. त्यासाठी संबंधित वर्गशिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाईचे संकेत शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता यावे, त्यांना गणित व विज्ञानाच्या संकल्पनांची उकल सहज व्हावी, अशी सक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र आठवीपर्यंत कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचा आभास निर्माण करून नववीत विद्यार्थ्यांना सरळ नापास करण्यात येत असल्याने त्यांचा विकास खुंटत आहे. त्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा येत आहे. त्यासाठी वर्षभराच्या कामकाजात दिरंगाई करणार्‍या वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाई केली जाणार आहे, असे शेवाळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लवकरच नववीचा अहवाल संचालकांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे. नववीपर्यंत लिहिता व वाचता येत नसेल तर शाळेत शिक्षण काय दिले, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेवाळे यांनी आश्चर्य व्यक्त केला. संस्था चालक संजय म्हस्के यांनी सांगितले, वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा, कौटुंबिक वातावरण या गोष्टीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणार्‍या आहेत. एकटा शिक्षकच सर्वकाही करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे राहणीमान, घराचा परिसर या बाबींचाही विपरित परिणाम शिक्षणावर होतो. दहावीचा निकाल घसरला तर संपूर्ण शाळेच्या गुणवत्तेचाच विचार करण्याची वेळ येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रगतीला शिक्षकच जबाबदार असल्याचे समजूर शिक्षण विभागाने शिक्षकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातही संभ्राम निर्माण झाला आहे. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचा आढावा घेणार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.