शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विषय शिक्षकांवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST

जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले.

जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान शिक्षण विभागासाठी मोठा प्रश्न आहे. त्यासाठी संबंधित वर्गशिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाईचे संकेत शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता यावे, त्यांना गणित व विज्ञानाच्या संकल्पनांची उकल सहज व्हावी, अशी सक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र आठवीपर्यंत कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचा आभास निर्माण करून नववीत विद्यार्थ्यांना सरळ नापास करण्यात येत असल्याने त्यांचा विकास खुंटत आहे. त्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा येत आहे. त्यासाठी वर्षभराच्या कामकाजात दिरंगाई करणार्‍या वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाई केली जाणार आहे, असे शेवाळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लवकरच नववीचा अहवाल संचालकांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे. नववीपर्यंत लिहिता व वाचता येत नसेल तर शाळेत शिक्षण काय दिले, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेवाळे यांनी आश्चर्य व्यक्त केला. संस्था चालक संजय म्हस्के यांनी सांगितले, वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा, कौटुंबिक वातावरण या गोष्टीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणार्‍या आहेत. एकटा शिक्षकच सर्वकाही करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे राहणीमान, घराचा परिसर या बाबींचाही विपरित परिणाम शिक्षणावर होतो. दहावीचा निकाल घसरला तर संपूर्ण शाळेच्या गुणवत्तेचाच विचार करण्याची वेळ येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रगतीला शिक्षकच जबाबदार असल्याचे समजूर शिक्षण विभागाने शिक्षकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातही संभ्राम निर्माण झाला आहे. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचा आढावा घेणार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.