शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विषय शिक्षकांवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST

जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले.

जालना : पहिलीपासून आठवीपर्यंत थेट पास होणार्‍या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सक्षम न करता नववीत नापास करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान शिक्षण विभागासाठी मोठा प्रश्न आहे. त्यासाठी संबंधित वर्गशिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाईचे संकेत शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता यावे, त्यांना गणित व विज्ञानाच्या संकल्पनांची उकल सहज व्हावी, अशी सक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र आठवीपर्यंत कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचा आभास निर्माण करून नववीत विद्यार्थ्यांना सरळ नापास करण्यात येत असल्याने त्यांचा विकास खुंटत आहे. त्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा येत आहे. त्यासाठी वर्षभराच्या कामकाजात दिरंगाई करणार्‍या वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांवर थेट कारवाई केली जाणार आहे, असे शेवाळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लवकरच नववीचा अहवाल संचालकांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे. नववीपर्यंत लिहिता व वाचता येत नसेल तर शाळेत शिक्षण काय दिले, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेवाळे यांनी आश्चर्य व्यक्त केला. संस्था चालक संजय म्हस्के यांनी सांगितले, वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा, कौटुंबिक वातावरण या गोष्टीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणार्‍या आहेत. एकटा शिक्षकच सर्वकाही करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे राहणीमान, घराचा परिसर या बाबींचाही विपरित परिणाम शिक्षणावर होतो. दहावीचा निकाल घसरला तर संपूर्ण शाळेच्या गुणवत्तेचाच विचार करण्याची वेळ येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रगतीला शिक्षकच जबाबदार असल्याचे समजूर शिक्षण विभागाने शिक्षकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातही संभ्राम निर्माण झाला आहे. (वार्ताहर) विद्यार्थ्यांचा आढावा घेणार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शेवाळे म्हणाले, शिक्षण संचालकांनी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरटीआई’ आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना तणावमुक्त व आनंदी वातावरणात शिक्षण देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.