शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
5
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
6
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
8
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
10
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
11
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
12
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
13
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
14
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
15
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
16
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
17
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
18
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
19
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
20
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 

सुभाष झांबड यांना काँग्रेसतर्फे औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:22 IST

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचे मत : अशोकराव चव्हाण यांनी जाणून घेतली तालुकावार मनोगते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.आज दुपारपासून स्वत: चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर व सिल्लोड या विधानसभा मतदारसंघवार कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे सूत्रसंचालन करीत होते व योग्य त्या सूचना देत होते. त्या- त्या तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांनी अशोकराव यांचे स्वागत केले.फुलंब्रीपासून सुरुवात झाली. नंतर गंगापूर, कन्नड व पैठण, अशी चर्चा झाली. वैजापूर आणि सिल्लोड या दोन्ही तालुक्यांची एकत्रित बैठक झाली.निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, या मुद्यांभोवती ही चर्चा फिरत होती. सिल्लोडची जागा अब्दुल सत्तार यांच्या रुपाने आजच निवडून आल्यात जमा आहे, असे सिल्लोडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर वैजापूर व अन्य तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सुभाष झांबड हे लोकसभेसाठी कसे योग्य उमेदवार राहतील, हे पटवून दिले.पैठणची चर्चा सुरू असताना अशोकराव हे पैठणचेच भूमिपुत्र आहेत. पैठणहून स्वत: त्यांनीच निवडणूक लढवावी, असे मत अब्दुल सत्तार यांनी नोंदविले. त्यावर अनिल पटेल उद्गारले, या प्रस्तावाला मी देऊ का पाठिंबा....! मग अशोकराव बोलते झाले, ‘माझं नांदेडला चांगलं चालू आहे. इकडे येण्याचा प्रश्नच नाही. फार तर मी पैठणचा अतिरिक्त आमदार आहे, असे समजा’. त्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.ओबीसींवर अन्याय नकोपैठणचे बाबासाहेब पवार यांनी आरोप केला की, ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसींना डावलले जाते व जे कुणबी मराठा आहेत, त्यांना तिकिटे देऊन मूळ ओबीसींवर अन्याय केला जातो. या मताशी अशोकराव चव्हाण यांनी सहमती दर्शविली. भिकाजी आठवले यांनी विद्यमान जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमकही झाली.