शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

सुभाष झांबड यांना काँग्रेसतर्फे औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:22 IST

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांचे मत : अशोकराव चव्हाण यांनी जाणून घेतली तालुकावार मनोगते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांचे काम चांगले असून, त्यांचा सर्व तालुक्यांमध्ये चांगला संपर्क आहे. ते जनतेत मिसळतात, जनतेचे प्रश्न समजावून घेतात व ते सोडविण्यासाठी झटतात. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी त्यांना दिल्यास ते निश्चितपणे जिंकतील, अशा शब्दात आज येथे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या.आज दुपारपासून स्वत: चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, पैठण, कन्नड, वैजापूर व सिल्लोड या विधानसभा मतदारसंघवार कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे सूत्रसंचालन करीत होते व योग्य त्या सूचना देत होते. त्या- त्या तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांनी अशोकराव यांचे स्वागत केले.फुलंब्रीपासून सुरुवात झाली. नंतर गंगापूर, कन्नड व पैठण, अशी चर्चा झाली. वैजापूर आणि सिल्लोड या दोन्ही तालुक्यांची एकत्रित बैठक झाली.निवडून येण्यासाठी काय केले पाहिजे, आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे, या मुद्यांभोवती ही चर्चा फिरत होती. सिल्लोडची जागा अब्दुल सत्तार यांच्या रुपाने आजच निवडून आल्यात जमा आहे, असे सिल्लोडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर वैजापूर व अन्य तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी सुभाष झांबड हे लोकसभेसाठी कसे योग्य उमेदवार राहतील, हे पटवून दिले.पैठणची चर्चा सुरू असताना अशोकराव हे पैठणचेच भूमिपुत्र आहेत. पैठणहून स्वत: त्यांनीच निवडणूक लढवावी, असे मत अब्दुल सत्तार यांनी नोंदविले. त्यावर अनिल पटेल उद्गारले, या प्रस्तावाला मी देऊ का पाठिंबा....! मग अशोकराव बोलते झाले, ‘माझं नांदेडला चांगलं चालू आहे. इकडे येण्याचा प्रश्नच नाही. फार तर मी पैठणचा अतिरिक्त आमदार आहे, असे समजा’. त्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.ओबीसींवर अन्याय नकोपैठणचे बाबासाहेब पवार यांनी आरोप केला की, ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसींना डावलले जाते व जे कुणबी मराठा आहेत, त्यांना तिकिटे देऊन मूळ ओबीसींवर अन्याय केला जातो. या मताशी अशोकराव चव्हाण यांनी सहमती दर्शविली. भिकाजी आठवले यांनी विद्यमान जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमकही झाली.