शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घ्यावा

By admin | Updated: August 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधन केले. या देशातील ते पहिले अर्थतज्ज्ञ होते. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गुरुवारी ‘स्वागत समारंभ’ आयोजित करण्यात आला. एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सांगळे होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, एकेकाळी सुवर्णभूमीचा देश म्हणून भारताची ओळख होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्तूंना मोठी मागणी होती. याशिवाय रुपयाची किंमत ही जास्त होती. ब्रिटिश राजवटीत मात्र इंग्रजांनी भारतातील उद्योग पळविले आणि रुपयाचे अवमूल्यनही केले. तेव्हा भारतीय रुपयाचे ढासळते मूल्य, यावर बाबासाहेबांनी संशोधन केले. त्यांनी ‘प्रॉब्लेम आॅफ रुपी’ हा शोधप्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली. शोधप्रबंधाच्या निष्कर्षातूनच या देशात ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’ची निर्मिती झाली. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा गुण जोपासला पाहिजे. जगात महासत्ता म्हणून आपणास पुढे यायचे असेल तर आपली अर्थसत्ता बळकट करावी लागेल. यासाठी दर्जेदार संशोन व संशोधक, अर्थतज्ज्ञ पुढे आले पाहिजेत, असेही कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले.यावेळी विभागप्रमुख डॉ. सांगळे, डॉ. विनायक भिसे, डॉ. धनश्री महाजन, डॉ. सुनील नरवडे, डॉ. कृतिका खंदारे, डॉ. अशोक पवार, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आदींची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.