शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घ्यावा

By admin | Updated: August 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधन केले. या देशातील ते पहिले अर्थतज्ज्ञ होते. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गुरुवारी ‘स्वागत समारंभ’ आयोजित करण्यात आला. एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सांगळे होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, एकेकाळी सुवर्णभूमीचा देश म्हणून भारताची ओळख होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्तूंना मोठी मागणी होती. याशिवाय रुपयाची किंमत ही जास्त होती. ब्रिटिश राजवटीत मात्र इंग्रजांनी भारतातील उद्योग पळविले आणि रुपयाचे अवमूल्यनही केले. तेव्हा भारतीय रुपयाचे ढासळते मूल्य, यावर बाबासाहेबांनी संशोधन केले. त्यांनी ‘प्रॉब्लेम आॅफ रुपी’ हा शोधप्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली. शोधप्रबंधाच्या निष्कर्षातूनच या देशात ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’ची निर्मिती झाली. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा गुण जोपासला पाहिजे. जगात महासत्ता म्हणून आपणास पुढे यायचे असेल तर आपली अर्थसत्ता बळकट करावी लागेल. यासाठी दर्जेदार संशोन व संशोधक, अर्थतज्ज्ञ पुढे आले पाहिजेत, असेही कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले.यावेळी विभागप्रमुख डॉ. सांगळे, डॉ. विनायक भिसे, डॉ. धनश्री महाजन, डॉ. सुनील नरवडे, डॉ. कृतिका खंदारे, डॉ. अशोक पवार, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आदींची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.