शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घ्यावा

By admin | Updated: August 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधन केले. या देशातील ते पहिले अर्थतज्ज्ञ होते. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गुरुवारी ‘स्वागत समारंभ’ आयोजित करण्यात आला. एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सांगळे होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, एकेकाळी सुवर्णभूमीचा देश म्हणून भारताची ओळख होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्तूंना मोठी मागणी होती. याशिवाय रुपयाची किंमत ही जास्त होती. ब्रिटिश राजवटीत मात्र इंग्रजांनी भारतातील उद्योग पळविले आणि रुपयाचे अवमूल्यनही केले. तेव्हा भारतीय रुपयाचे ढासळते मूल्य, यावर बाबासाहेबांनी संशोधन केले. त्यांनी ‘प्रॉब्लेम आॅफ रुपी’ हा शोधप्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली. शोधप्रबंधाच्या निष्कर्षातूनच या देशात ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’ची निर्मिती झाली. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संशोधकवृत्तीचा गुण जोपासला पाहिजे. जगात महासत्ता म्हणून आपणास पुढे यायचे असेल तर आपली अर्थसत्ता बळकट करावी लागेल. यासाठी दर्जेदार संशोन व संशोधक, अर्थतज्ज्ञ पुढे आले पाहिजेत, असेही कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले.यावेळी विभागप्रमुख डॉ. सांगळे, डॉ. विनायक भिसे, डॉ. धनश्री महाजन, डॉ. सुनील नरवडे, डॉ. कृतिका खंदारे, डॉ. अशोक पवार, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आदींची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.