शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

बीड: मान्सूनचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी राजा शेतातील कामे पूर्ण करुन वरुणराजाची प्रतीक्षा करू लागली आहे.

बीड: मान्सूनचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी राजा शेतातील कामे पूर्ण करुन वरुणराजाची प्रतीक्षा करू लागली आहे. पाऊस येण्यापूर्वी आपल्या जमिनी कशा पद्धतीने मशागत करणे आवश्यक आहे? त्यासाठी जमिनीची पोषकता कशी असायला हवी आदी बाबींवर विद्यार्थी बीड तालुक्यात मार्गदर्शन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बीड शहरातील आदित्य कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील काकडहिरा, तिप्पटवाडी येथे जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण टी. मुंडे व के.डी. नागरगोजे यांनी ८० विद्यार्थ्यांचे प्रत्येकी १० याप्रमाणे ८ पथक तयार केले आहेत. हे ८ पथक तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. हे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करुन त्या शेतामध्ये कोणते पीक घेणे आवश्यक आहे व कोणते पीक जास्त उत्पादन देऊ शकते? यासाठी शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत आणत आहेत. या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, या विद्यार्थ्यांना गावातील शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. तिप्पटवाडीचे सरपंच रामहरी चोरमले, उपसरपंच, सुरेश जाधव, काकडहिऱ्याचे पोलीस पाटील अनुरथ बागलाने, नानासाहेब बागलाने यांचे सहकार्य लाभले. कैलास गव्हाणे, सुनील आडे, सागर जाधव, विनायक गिरी, विष्णू जायभाये, रोहिणी बिराजदार, शोभा जाधव, बाईजा चादर, सविता शिंदे, नितीन गाडे, चेतन इंगोले, गणेश पिसे, अमोल देवकते, संदीप ढाळे, जालिंदर जोरे, अशोक खंडागळे, रोहन काळे, सचिन सातपुते, सुनील हारदे आदी विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे.(प्रतिनिधी)