शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघतोच!

By admin | Updated: June 19, 2014 00:28 IST

जालना : विद्यार्थी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे.

जालना : विद्यार्थी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनीच विद्यार्थ्यांना सर्व समस्यांवर तोडगा काढता येतो, हार मानू नका, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. परीक्षेत नापास झालो म्हणून नैराश्यात जाने, खचून जाणे त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडल्याचे आपण नेहमीच वाचतो, ऐकतो. परंतु मुलाला कमी मार्क मिळाले, नापास झाला तरी त्याची योग्य पद्धतीने पालकांनी समजूत काढणे गरजेचे आहे. इतर मुलांची आपल्या पाल्याशी तुलना करून आपल्या मुलांवर दबाव टाकणे हे अत्यंत घातक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. एकमेकांशी तुलना :विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेबद्दल व पालकांच्या आग्रही वृत्तीबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कुमार सारस्वत, डॉ. आनंद अग्रवाल, प्रा. चंद्रकांत धोत्रे यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी टीव्हीवरील सिरीयल, चित्रपटातील विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन पाहून त्याची स्वत:शी तुलना करतात. तसेच आपसातही एकमेकांशी तुलना करतात. अमूक विद्यार्थी हुशार आहे. त्याचे आईवडील मदत करतात, अशा स्वरूपाची तुलनाही करतात. न्यूनगंड तयार होतो:आईवडीलही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांचे उदाहरण देऊन बघ त्याला कसे चांगले गुण मिळाले, वगैरे तुलना करतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषत: मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊन न्यूनगंड तयार होतो. त्यातच अशी मुले जर हळव्या मनाची असतील तर आत्महत्येकडे वळतात. जीवघेणी स्पर्धा :अनेकदा आपल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत आईवडिलांकडे नसल्याने ते अडचणीत आलेले पाहूनही मुलांना नैराश्य येते. त्यांना बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे आई-वडिलांवर शिक्षणाचा भार येत नाही, हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊनच चांगले करिअर होऊ शकते असे नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे, हे बिंबविणेही गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा कमी होऊन मुलांच्या मनावरील ताण कमी होईल. मानसिक आजारही जडतात :अनेकदा मुलांना मानसिक आजारही जडतात. मात्र आईवडील ते मान्य करायला तयार होत नाहीत. भारतात या आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मुले आत्महत्येकडे वळत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष झाले तर खूपच नैराश्य येऊन ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे या आजारांबाबतही सामाजिक उद्बोधनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जरी मुले चुकली, तरीही त्यांना ती आपली मुले असल्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम असल्याची जाणीव पालकांनी त्यांना करून दिली पाहिजे. तसेच मुलांच्या वागणुकीत जर बदल जाणवला तर मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले तर त्यांना नैराश्य येणार नाही व आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत. (प्रतिनिधी)प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वेगळी असते. दहावीवर ती मापू नये. जगात अनेक व्यक्तींनी दहावी नसतानाही यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. पालकांनी दहावीच्या गुणांवर त्यांचा ग्रेड ठरवू नये. ४० टक्के पडले म्हणून त्याची क्षमता तेवढीच आहे, असे नसते. पालकांनी मुलांशी संवाद कायम राखला पाहिजे. जेणेकरून मुले त्यांच्या अडचणी मनमोकळेपणाने मांडू शकतील व आत्महत्येसारखे अतिरेकी पाऊल उचलणार नाही.-डॉ. कुमारश्री सारस्वत , मानसोपचार तज्ज्ञ.विद्यार्थ्यांवर पालक आपल्या अपेक्षेचे ओझे टाकतात. त्यांच्यावर दडपण येते. तसे न करता विद्यार्थ्यांना निर्णय घेऊ द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी पालक व शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात याकडे दुर्लक्ष होत आहे. फक्त शर्यतीवर भर देण्यात येतो. आपला पाल्य कसा अव्वल येईल याकडे सर्व पाहतात. मात्र सर्वकाही मार्कच आहे असे नाही. चांगले बोलणे व वागण्यातूनही यशस्वी होता येते.-डॉ.आनंद अग्रवाल, मानसोपचार तज्ज्ञ.जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या वाढत्या अपेक्षा व विद्यार्थ्यांच्या मर्यादा यांचा कधी-कधी ताळमेळ बसत नाही. त्यामुळे मानसिक संघर्षातून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. हे नैराश्य वाढले तर मुले आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची क्षमता ओळखूनच अभ्यासक्रम घेऊ द्यावा. जेणेकरून हा संघर्ष उद्भवण्याची वेळ येणार नाही. -प्रा. चंद्रकांत धोत्रे, (मानसशास्त्र विभाग) डॉ. बारवाले महाविद्यालय