शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

खाजगी क्लासचालकांना पुरविला जातोय शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:52 IST

८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे.

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार : पालकांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी; शाळांकडून स्पष्टीकरण मागविणार

औरंगाबाद : ८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे. सतत येणाºया फोनमुळे त्रस्त झालेल्या पालकांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.बारावी नंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी नीट, जेईई, एमएच-सीईटी अशा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची तयारी विद्यार्थी नववीत गेल्यानंतर सुरू होते. नववीत असतानाच बारावीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी क्लास लावण्यात येत आहेत. दहावी झाल्यानंतरही अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेताना या परीक्षेसाठी खाजगी क्लास लावण्यात येतो. महाविद्यालयात विद्यार्थी कमी आणि खाजगी क्लासला अधिक, अशी परिस्थिती सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. यासाठी विविध प्रलोभने, आमिषे दाखविण्यात येतात. यात आता आठवीच्या विद्यार्थ्यांना ओढण्यात येत आहे. आठवीपासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी खाजगी क्लास चालकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी क्लासेसवाल्यांनी शहरातील नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती मिळविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात विद्यार्थिनींचीही माहिती असल्यामुळे पालकांना धक्का बसला आहे. या खाजगी संस्थाचालकांकडे पालकांचा मोबाईल नंबर, घराचा पत्ता, विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर, अशी सगळीच गोपनीय माहिती जमा झाली आहे. ही माहिती संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेकडे नोंदविलेली असल्यामुळे शाळांकडूनच क्लासेसवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा विकण्यात आल्याचा संशय पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारींची शहानिशा शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे करीत आहेत. यात शाळा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची शिफारसही शासनाकडे केली जाईल, असेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.कोटखाजगी क्लासवाल्यांकडून सतत फोन येत असल्याच्या तक्रारी दहा ते बारा पालकांनी केल्या आहेत. या क्लासवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा कोणी दिला, असा सवाल पालकांनीच उपस्थित केला आहे. पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित नामांकित शाळांकडे विचारणा करण्यात आली आहे. यातील सत्य परिस्थिती लवकरच बाहेर येईल.- डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक---

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण