शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खाजगी क्लासचालकांना पुरविला जातोय शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:52 IST

८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे.

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार : पालकांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी; शाळांकडून स्पष्टीकरण मागविणार

औरंगाबाद : ८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे. सतत येणाºया फोनमुळे त्रस्त झालेल्या पालकांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.बारावी नंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी नीट, जेईई, एमएच-सीईटी अशा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची तयारी विद्यार्थी नववीत गेल्यानंतर सुरू होते. नववीत असतानाच बारावीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी क्लास लावण्यात येत आहेत. दहावी झाल्यानंतरही अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेताना या परीक्षेसाठी खाजगी क्लास लावण्यात येतो. महाविद्यालयात विद्यार्थी कमी आणि खाजगी क्लासला अधिक, अशी परिस्थिती सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. यासाठी विविध प्रलोभने, आमिषे दाखविण्यात येतात. यात आता आठवीच्या विद्यार्थ्यांना ओढण्यात येत आहे. आठवीपासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी खाजगी क्लास चालकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी क्लासेसवाल्यांनी शहरातील नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती मिळविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात विद्यार्थिनींचीही माहिती असल्यामुळे पालकांना धक्का बसला आहे. या खाजगी संस्थाचालकांकडे पालकांचा मोबाईल नंबर, घराचा पत्ता, विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर, अशी सगळीच गोपनीय माहिती जमा झाली आहे. ही माहिती संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेकडे नोंदविलेली असल्यामुळे शाळांकडूनच क्लासेसवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा विकण्यात आल्याचा संशय पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारींची शहानिशा शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे करीत आहेत. यात शाळा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची शिफारसही शासनाकडे केली जाईल, असेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.कोटखाजगी क्लासवाल्यांकडून सतत फोन येत असल्याच्या तक्रारी दहा ते बारा पालकांनी केल्या आहेत. या क्लासवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा कोणी दिला, असा सवाल पालकांनीच उपस्थित केला आहे. पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित नामांकित शाळांकडे विचारणा करण्यात आली आहे. यातील सत्य परिस्थिती लवकरच बाहेर येईल.- डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक---

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण