शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

खाजगी क्लासचालकांना पुरविला जातोय शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:52 IST

८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे.

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार : पालकांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी; शाळांकडून स्पष्टीकरण मागविणार

औरंगाबाद : ८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे. सतत येणाºया फोनमुळे त्रस्त झालेल्या पालकांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.बारावी नंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी नीट, जेईई, एमएच-सीईटी अशा परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची तयारी विद्यार्थी नववीत गेल्यानंतर सुरू होते. नववीत असतानाच बारावीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी क्लास लावण्यात येत आहेत. दहावी झाल्यानंतरही अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेताना या परीक्षेसाठी खाजगी क्लास लावण्यात येतो. महाविद्यालयात विद्यार्थी कमी आणि खाजगी क्लासला अधिक, अशी परिस्थिती सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. यासाठी विविध प्रलोभने, आमिषे दाखविण्यात येतात. यात आता आठवीच्या विद्यार्थ्यांना ओढण्यात येत आहे. आठवीपासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी खाजगी क्लास चालकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी क्लासेसवाल्यांनी शहरातील नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती मिळविली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात विद्यार्थिनींचीही माहिती असल्यामुळे पालकांना धक्का बसला आहे. या खाजगी संस्थाचालकांकडे पालकांचा मोबाईल नंबर, घराचा पत्ता, विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर, अशी सगळीच गोपनीय माहिती जमा झाली आहे. ही माहिती संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेकडे नोंदविलेली असल्यामुळे शाळांकडूनच क्लासेसवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा विकण्यात आल्याचा संशय पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारींची शहानिशा शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण हे करीत आहेत. यात शाळा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची शिफारसही शासनाकडे केली जाईल, असेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.कोटखाजगी क्लासवाल्यांकडून सतत फोन येत असल्याच्या तक्रारी दहा ते बारा पालकांनी केल्या आहेत. या क्लासवाल्यांना विद्यार्थ्यांचा डाटा कोणी दिला, असा सवाल पालकांनीच उपस्थित केला आहे. पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित नामांकित शाळांकडे विचारणा करण्यात आली आहे. यातील सत्य परिस्थिती लवकरच बाहेर येईल.- डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक---

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण