शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:57 IST

शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रेल्वेस्टेशनवरील पादचारी पुलांचे (दादरा) स्ट्रक्चरल आॅडिट कागदावरच आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन पुलांवर प्रवाशांची भिस्त आहे; परंतु अरुंद जागेमुळे दररोज हजारो प्रवाशांना गर्दीतून ये-जा करावी लागत आहे, तर रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याने कधीही दुर्घटना घडू शकते.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज धावणाºया, आठवड्यातून एकदा, दोनदा आणि तीनदा धावणाºया अशा ६१ रेल्वेंची येथून ये-जा होते. रेल्वेस्टेशनच्या नव्या आणि जुन्या इमारतीसमोर पादचारी पूल आहे. प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर येणाºया रेल्वेतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी हे दोन्ही पूल महत्त्वाचे ठरतात. पादचारी पुलांना जोडूनच सरकता जिना आणि लिफ्टची सुविधा आहे; परंतु अनेकदा ते बंद असतात. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर रेल्वे आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीने पादचारी पूल खचाखच भरून जातो. शिवाय गर्दीच्या नियंत्रणासाठी क ोणीही नसते. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तसेच रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा भागात राहणाºया नागरिकांच्या सुविधेसाठी मालधक्का ते रेल्वेस्टेशन पार्किंग असा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. ये-जा करण्यासाठी रेल्वेस्टेशनवरील रुळांऐवजी हा पूल महत्त्वपूर्ण ठरतो; परंतु आजघडीला या पुलाची अवस्था वाईट आहे. जागोजागी फरशा उखडल्या आहेत, तसेच काही ठिकाणी पुलाचा स्लॅब धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याचा वापर टाळला जात आहे. त्यामुळे पुलाची वेळीच देखभाल-दुरुस्तीची गरज आहे. रेल्वेस्टेशनवरील दोन्ही पूल चांगल्या अवस्थेत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या पुलाची माहिती घेतली जाईल, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.