शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
3
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
4
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
5
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
6
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
7
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
8
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
9
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
10
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
11
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
12
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी
13
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
14
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
15
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
16
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
17
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
18
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
19
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
20
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By admin | Updated: August 4, 2015 00:39 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पावणेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पावणेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे. यासोबतच ७ पोलीस उपअधीक्षक, ३५ निरीक्षक आणि १६२ फौजदार, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान यंत्रे ३ आॅगस्ट रोजी विविध गावांसाठी रवाना झाली.याविषयी ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ग्रामीण पोलीस दलाने राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ७ उपअधीक्षक, २८ निरीक्षकांसह २०० अधिकारी, २४०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. बंदोबस्ताविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त संदीप आटोळे म्हणाले की, आयुक्तालय हद्दीत १३८ बुथवर हे मतदान होईल. त्यासाठी ६ पोलीस निरीक्षक, ७ फौजदार, २३० कॉन्स्टेबल आणि ६५ महिला कर्मचारी यांच्यासह दोन स्ट्रायकिंग स्क्वॉड आणि एस.आर.पी.एफ. च्या एका कंपनीचा यात समावेश आहे. यासोबतच गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येत आहे.औरंगाबाद : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य, कर्मचारी आणि अन्य साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी एस. टी. महामंडळाने १६६ बसगाड्या पुरविल्या आहेत. या बसगाड्यातून महामंडळाच्या उत्पन्नात चांगली भर पडणार आहे.एस. टी. महामंडळाच्या वतीने औरंगाबाद विभागातील प्रत्येक आगारातून निवडणुकीच्या कामासाठी बस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान साहित्य, कर्मचारी घेऊन सोमवारी १६६ बसेस मतदान केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा या बसेसद्वारे मतदान साहित्य नियोजित जागेवर पोहोचविण्यात येणार आहे. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळीही एस. टी. महामंडळातर्फे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, कर्मचारी आणि अन्य साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. एकाच वेळी १६६ बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. विविध मार्गांवरील बसेसची बऱ्याच वेळ प्रतीक्षा करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.