शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By admin | Updated: August 4, 2015 00:39 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पावणेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पावणेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे. यासोबतच ७ पोलीस उपअधीक्षक, ३५ निरीक्षक आणि १६२ फौजदार, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान यंत्रे ३ आॅगस्ट रोजी विविध गावांसाठी रवाना झाली.याविषयी ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ग्रामीण पोलीस दलाने राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ७ उपअधीक्षक, २८ निरीक्षकांसह २०० अधिकारी, २४०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. बंदोबस्ताविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त संदीप आटोळे म्हणाले की, आयुक्तालय हद्दीत १३८ बुथवर हे मतदान होईल. त्यासाठी ६ पोलीस निरीक्षक, ७ फौजदार, २३० कॉन्स्टेबल आणि ६५ महिला कर्मचारी यांच्यासह दोन स्ट्रायकिंग स्क्वॉड आणि एस.आर.पी.एफ. च्या एका कंपनीचा यात समावेश आहे. यासोबतच गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येत आहे.औरंगाबाद : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य, कर्मचारी आणि अन्य साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी एस. टी. महामंडळाने १६६ बसगाड्या पुरविल्या आहेत. या बसगाड्यातून महामंडळाच्या उत्पन्नात चांगली भर पडणार आहे.एस. टी. महामंडळाच्या वतीने औरंगाबाद विभागातील प्रत्येक आगारातून निवडणुकीच्या कामासाठी बस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान साहित्य, कर्मचारी घेऊन सोमवारी १६६ बसेस मतदान केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा या बसेसद्वारे मतदान साहित्य नियोजित जागेवर पोहोचविण्यात येणार आहे. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळीही एस. टी. महामंडळातर्फे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, कर्मचारी आणि अन्य साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. एकाच वेळी १६६ बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. विविध मार्गांवरील बसेसची बऱ्याच वेळ प्रतीक्षा करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.