शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

अटीतटीच्या लढतीत प्रस्थापितांना धक्के

By admin | Updated: November 4, 2015 00:23 IST

जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना

जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना धक्के बसल्याचे चित्र या निकालावरून स्पष्ट होत आहे. तर मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे निकालावरून दिसून येते. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक विभागाच्या वतीने निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याचे तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. तत्पूर्वी २२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाल्याने ही निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती. कधी नव्हे ती, चुरशीची लढत या निवडणुकीदरम्यान पहायला मिळाली. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक आघाड्यांनीही प्रचारात आघाडी घेत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा अंतर्गत गटबाजी, भाऊबंदकी, हेवेदावे हेच अधिक प्रभावी ठरले असून, काही ठिकाणी ही निवडणूक व्यक्तीकेंद्रीत झाल्याचे दिसून आले. एकूणच सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला असला तरी खरे चित्र काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. तर अनेक ठिकाणी सरपंच निवडीसाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राजकारणावरील पकड ही गाव पातळीवरच्या निवडणुकीपासून सुरू होते. आपली पकड अधिक मजबूत व्हावी या दृष्टिने राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही सर्वशक्ती पणाला लावली होती. यातील काहींना यश आले तर काहींना अपयश. स्थानिक पातळीवरील निवडणूक ही पक्षविरहित होत असल्याचा अनुभव असला तरी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासह अन्य पक्षांनी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. निकालाचा अधिक तपशील हाती आल्यावरच या दाव्यातील सत्यता पुढे येऊ शकेल.