शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

अटीतटीच्या लढतीत प्रस्थापितांना धक्के

By admin | Updated: November 4, 2015 00:23 IST

जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना

जालना : जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकांत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक प्रस्थापितांना धक्के बसल्याचे चित्र या निकालावरून स्पष्ट होत आहे. तर मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे निकालावरून दिसून येते. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक विभागाच्या वतीने निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याचे तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. तत्पूर्वी २२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाल्याने ही निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती. कधी नव्हे ती, चुरशीची लढत या निवडणुकीदरम्यान पहायला मिळाली. प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच स्थानिक आघाड्यांनीही प्रचारात आघाडी घेत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा अंतर्गत गटबाजी, भाऊबंदकी, हेवेदावे हेच अधिक प्रभावी ठरले असून, काही ठिकाणी ही निवडणूक व्यक्तीकेंद्रीत झाल्याचे दिसून आले. एकूणच सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला असला तरी खरे चित्र काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. तर अनेक ठिकाणी सरपंच निवडीसाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राजकारणावरील पकड ही गाव पातळीवरच्या निवडणुकीपासून सुरू होते. आपली पकड अधिक मजबूत व्हावी या दृष्टिने राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही सर्वशक्ती पणाला लावली होती. यातील काहींना यश आले तर काहींना अपयश. स्थानिक पातळीवरील निवडणूक ही पक्षविरहित होत असल्याचा अनुभव असला तरी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासह अन्य पक्षांनी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. निकालाचा अधिक तपशील हाती आल्यावरच या दाव्यातील सत्यता पुढे येऊ शकेल.