शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

५० किलो शेतमालाच्या वजनाची कडक अंमलबजावणी करा - खोतकर

By admin | Updated: June 28, 2017 00:41 IST

जालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये. याची सर्व व्यापारी, आडतिया, खरेदीदार, हमाल मापाडी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची हाताळणी करणे संबंधितांच्या आरोग्यास घातक ठरणारे असल्याने अशी हाताळणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने असे मोजमापच करू नये, असा निर्णय दिला होता.यामुळे राज्य पणन महासंघाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्वच बाजार समितींना आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री तथा सभापती अर्जुन खोतकर यांनी या निर्णयात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा होता कामा नये म्हणून जालना बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या निर्णयाचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने सभापती खोतकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समितीतील आडतिया, व्यापारी, हमाल, मापाडी यांना कडक सूचना देत याची १ जुलैपासून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १०० किलोऐवजी ५० किलोमध्येच वजनमाप करण्यात यावे. अन्यथा संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी स्पष्ट केले.बैठकीस उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले, संचालक मंडळ उपस्थित होते.