शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

५० किलो शेतमालाच्या वजनाची कडक अंमलबजावणी करा - खोतकर

By admin | Updated: June 28, 2017 00:41 IST

जालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या शेतमालाची हाताळणी, चढ- उतार करण्यास हमाल, मापाडींच्या आरोग्यास घातक असल्याने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची वजनमाप बाजार समितीत करू नये. याची सर्व व्यापारी, आडतिया, खरेदीदार, हमाल मापाडी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची हाताळणी करणे संबंधितांच्या आरोग्यास घातक ठरणारे असल्याने अशी हाताळणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने असे मोजमापच करू नये, असा निर्णय दिला होता.यामुळे राज्य पणन महासंघाने १ फेब्रुवारी २०१६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्वच बाजार समितींना आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री तथा सभापती अर्जुन खोतकर यांनी या निर्णयात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा होता कामा नये म्हणून जालना बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या निर्णयाचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने सभापती खोतकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार समितीतील आडतिया, व्यापारी, हमाल, मापाडी यांना कडक सूचना देत याची १ जुलैपासून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १०० किलोऐवजी ५० किलोमध्येच वजनमाप करण्यात यावे. अन्यथा संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी स्पष्ट केले.बैठकीस उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले, संचालक मंडळ उपस्थित होते.