शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST

घनसावंगी : दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

घनसावंगी : दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.येथील तहसील कार्यालयात गुरुवारी पालकमंत्री लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आ. राजेश टोपे, माजी आ. विलास खरात, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. ठोंबरे, संजय तौर, राहुल लोणीकर, फैय्याज पठाण यांच्यासह अन्य उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात या बैठकीत वादळी चर्चा झाली. काही सदस्यांनी पाणी पुरवठ्याबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या. त्यासंदर्भात पंचायत समितीसह पाटबंधारे खात्याचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देवू शकले नाही. त्यामुळे पालकमंत्री कमालीचे संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करुन बैठकांना उपस्थित राहिले पाहिजे, असा सुनावून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री लोणीकर यांनी त्यांना कठोर शब्दात समज दिली. चुकीची उत्तरे दिल्यास यापुढे निलंबीत केले जाईल, असाही इशारा दिला.अधिकाऱ्यांनी दुष्काळी कामात गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे. बैठकांना हजेरी लावावी, अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी वगैरे बैठकांना पाठवू नयेत, स्वत: उपस्थित राहावे, अन्यथा त्यांच्याविरोधातही वेतन कपातीचे आदेश काढले जातील, असा इशारा दिला. यावेळी दुष्काळी उपाय योजनांच्या कामात अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या व्यथांची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा घनसावंगीत सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी माजी आ. विलासराव खरात, हिकमतराव उढाण, संजय तौर, दिलीप तौर, राहुल लोणीकर, शाम उढाण, सुनील आर्दड, किरण खरात, दत्ता सुरोसे, रविंद्र तौर आदि उपस्थित होते.४ यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द राहू, अशी ग्वाही दिली. सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलो आहोत. परिस्थितीअभावी पुरेसे शिक्षण सुद्धा घेऊ शकलो नाही. परंतु ग्रामीण भागाची नाळ कधी तोडली नाही. ३२ वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिलो असून आता संधी मिळाल्याने संपूर्ण राज्यास स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द राहु, अशी ग्वाही दिली. यावेळी हिकमतराव उढाण, विलास खरात, दिलीप तौर, संजय तौर व राहुल लोणीकर यांची भाषणे झाली. यावेळी गणेशनंदजी महाराज, श्रीकृष्ण पुरी महाराज, दिव्यानंद महामंडलेश्वर महाराज यांच्यासह पंढरीनाथ उगले, विष्णू जाधव, देवनाथ जाधव, अंकुश बोबडे, शैलेश पवार, औदुंबर बागडे, अ‍ॅड. शिवतारे, फैय्याज पठाण, किरण खरात, दिगंबर आर्दड, अरविंद घोगरे, विष्णू जाधव आदी उपस्थित होते.