शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

व्यसनाधीन युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात : ढोबळे

By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST

तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़

तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़ साहित्य संमेलनातून नवोदितांना आत्मचिंतन करण्याची संधी मिळत असून, हे संमेलन मानवाला सुसंस्कृत बनवते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २२ व्या नवोदित साहित्य संमेलनाचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले़ यानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत काँ़ गोविंद पानसरे विचारपीठावरून संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे हे बोलत होते़ प्रारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम, स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, निमंत्रक दिलीपराव कोद्रे, पत्रकार मंदार फणसे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, सरचिटणीस दशरथ यादव, पत्रकार राजेंद्र माने, रा. स.प.चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब जोब्दे, विशाल सोनटक्के, अतुल गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर चित्ते यांची उपस्थिती होती. यावेळी मंदार फणसे म्हणाले, देशातील बऱ्याच राज्यात मराठी भाषा बोलली जाते़ येणाऱ्या काळात ग्रामीण भागावर मराठी भाषा अवलंबून राहणार असल्याने ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणारे साहित्य निर्माण करण्याचे काम करणार आहोत़ तर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष शरद गोरे म्हणाले, साहित्य संमेलने ही माणसाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत. चुकलेल्या माणसाला चांगला मार्ग दाखविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले़ तसेच समीर जगे, राजकुमार काळभोर, राजेंद्र माने, मोरेश्वर मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटच्या सत्रात साहित्य परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंदार फणसे यांना छत्रपती शाहू महाराज आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर समीर जत्रे, विशाल बोरे, विजय वडवराव, डी. बी. थोरात, संजय सावंत, विठ्ठल मोरे, राजेंद्र माने, अनिल खंदारे, बाळासाहेब हाडोंग्रीकर, खंडेराव जगदाळे यांना गौरविण्यात आले. यावेळी साहित्यिक, कवी, कथाकार, साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे विश्वस्त सतीश मडके यांनी तर आभार अतुल गायकवाड यांनी मानले. (वार्ताहर)