शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

व्यसनाधीन युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात : ढोबळे

By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST

तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़

तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़ साहित्य संमेलनातून नवोदितांना आत्मचिंतन करण्याची संधी मिळत असून, हे संमेलन मानवाला सुसंस्कृत बनवते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २२ व्या नवोदित साहित्य संमेलनाचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले़ यानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत काँ़ गोविंद पानसरे विचारपीठावरून संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे हे बोलत होते़ प्रारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम, स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, निमंत्रक दिलीपराव कोद्रे, पत्रकार मंदार फणसे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, सरचिटणीस दशरथ यादव, पत्रकार राजेंद्र माने, रा. स.प.चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब जोब्दे, विशाल सोनटक्के, अतुल गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर चित्ते यांची उपस्थिती होती. यावेळी मंदार फणसे म्हणाले, देशातील बऱ्याच राज्यात मराठी भाषा बोलली जाते़ येणाऱ्या काळात ग्रामीण भागावर मराठी भाषा अवलंबून राहणार असल्याने ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणारे साहित्य निर्माण करण्याचे काम करणार आहोत़ तर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष शरद गोरे म्हणाले, साहित्य संमेलने ही माणसाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत. चुकलेल्या माणसाला चांगला मार्ग दाखविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले़ तसेच समीर जगे, राजकुमार काळभोर, राजेंद्र माने, मोरेश्वर मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटच्या सत्रात साहित्य परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंदार फणसे यांना छत्रपती शाहू महाराज आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर समीर जत्रे, विशाल बोरे, विजय वडवराव, डी. बी. थोरात, संजय सावंत, विठ्ठल मोरे, राजेंद्र माने, अनिल खंदारे, बाळासाहेब हाडोंग्रीकर, खंडेराव जगदाळे यांना गौरविण्यात आले. यावेळी साहित्यिक, कवी, कथाकार, साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे विश्वस्त सतीश मडके यांनी तर आभार अतुल गायकवाड यांनी मानले. (वार्ताहर)