शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधीन युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात : ढोबळे

By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST

तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़

तुळजापूर : गुटखा, दारूबंदी याशिवाय इतर व्यसनांच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला आवरण्याचं सामर्थ्य साहित्य संमेलनात आहे़ साहित्य संमेलनातून नवोदितांना आत्मचिंतन करण्याची संधी मिळत असून, हे संमेलन मानवाला सुसंस्कृत बनवते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २२ व्या नवोदित साहित्य संमेलनाचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले़ यानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत काँ़ गोविंद पानसरे विचारपीठावरून संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे हे बोलत होते़ प्रारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम, स्वागताध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, निमंत्रक दिलीपराव कोद्रे, पत्रकार मंदार फणसे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, सरचिटणीस दशरथ यादव, पत्रकार राजेंद्र माने, रा. स.प.चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब जोब्दे, विशाल सोनटक्के, अतुल गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर चित्ते यांची उपस्थिती होती. यावेळी मंदार फणसे म्हणाले, देशातील बऱ्याच राज्यात मराठी भाषा बोलली जाते़ येणाऱ्या काळात ग्रामीण भागावर मराठी भाषा अवलंबून राहणार असल्याने ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणारे साहित्य निर्माण करण्याचे काम करणार आहोत़ तर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष शरद गोरे म्हणाले, साहित्य संमेलने ही माणसाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत. चुकलेल्या माणसाला चांगला मार्ग दाखविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले़ तसेच समीर जगे, राजकुमार काळभोर, राजेंद्र माने, मोरेश्वर मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटच्या सत्रात साहित्य परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंदार फणसे यांना छत्रपती शाहू महाराज आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर समीर जत्रे, विशाल बोरे, विजय वडवराव, डी. बी. थोरात, संजय सावंत, विठ्ठल मोरे, राजेंद्र माने, अनिल खंदारे, बाळासाहेब हाडोंग्रीकर, खंडेराव जगदाळे यांना गौरविण्यात आले. यावेळी साहित्यिक, कवी, कथाकार, साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे विश्वस्त सतीश मडके यांनी तर आभार अतुल गायकवाड यांनी मानले. (वार्ताहर)