शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

कथाकथनातून समाजमांडणी

By admin | Updated: July 27, 2014 01:13 IST

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शनिवारी दुपारी दुसऱ्या सत्रात कथाकथन घेण्यात आले़

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शनिवारी दुपारी दुसऱ्या सत्रात कथाकथन घेण्यात आले़ यामध्ये हिंगोली येथील कथाकार शिलवंत वाढवे यांनी सादर केलेल्या पटपडताळणी या शैक्षणिक क्षेत्रावरील कथेस कथाप्रेमीतून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला़लोकनेते विलासराव देशमुख साहित्यनगरी, महात्मा बसवेश्वर विचारपीठावर दयानंद सभागृहात संमेलनाच्या तिसऱ्या टप्यात शनिवारी कथाकथन कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी कथाकार डॉ़ भास्कर बडे होते़ मंचावर अंबादास पवार, अरून गिरी, प्रकाश घादगिने, काका शिंदे, शिलवंत वाढवे, बेबी सरोज, शिवाजी गुट्टे, आनंद कदम आदी मान्यवर उपस्थित होते़हिंगोली येथील शिलवंत वाढवे यांनी ‘पटपडताळणी’ या कथेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था व तेथील संस्थाचालकांचा तोरा काय असतो़ त्यांना घाबरून संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेला विद्यार्थी मिळविण्यासाठी काय कसरत करावी लागते़ परंतू पटपडताळणीच्या वेळी वास्तवात संस्थाचालक व शिक्षकांची काय भंबेरी उडते यांचे वास्तव दर्शन घडविण्याचा प्रयत्न वाढवे यांनी आपल्या ‘पटपडताळणी’ या कथेतून केला़ लातूर येथील कथाकार प्रकाश घादगिने यांनी कोकीळेचा त्याग या कथेच्या माध्यमातून कश्मिर येथे हनिमूनला गेलेल्या जोडप्याचा प्रसंग मांडण्याचा प्रयत्न केला़ त्यांच्यात गुलाबी फुल व पांढऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या मोहापोटी झालेला त्याचा विरह व त्यांना एकत्र करण्यासाठी केलेला कोकीळेचा प्रयत्न प्रेक्षकांसमोर सादर करून निसर्गकथेचे महत्व त्यांनी दाखवून दिले आहे़बोरी येथील काका शिंदे या कथाकारांने ‘अहिल्या’ या कथेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरी करणारी सिमंता व तिच्यावर होणारा दारूड्या पतीचा अत्याचाऱ, पतीचा आजाराने झालेला मृत्यू़ ‘अहिल्या’ या निरागस मुलीवर एका दुकानदाराने केलेला अत्याचार त्यातूनही न्यायालयात धाव घेतली असता पुराव्याअभावी होणारी आरोपीची मुक्तता याचे वास्तव चित्रण उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ तर अंबादास केदार यांनी ‘धुरा’ ही कथा सादर केली़ यावेळी सौदागर नवगिरे, डॉ़ श्रीकांत भुजबळ, सुनिल गोयकर, बालाजी शितोळे, तुकाराम कुर्तडकर, शशिकांत सावंत, विठ्ठलराव जोंधळे, राजेंद्र कोळगे, सत्यवान जगताप, मधुर काळभोर यांना छत्रपती संभाजी राजे व महात्मा फुले गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले़ (प्रतिनिधी)लातुरातील दयानंद सभागृहात आयोजित नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लातूरकरांना वैैचारिक मेजवाणी उपलब्ध झाली आहे़ यासोबतच विविध लेखकांची शेकडो पुस्तकेही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत़सभागृहाबाहेर जवळपास १० स्टॉलवरुन पुस्तकांची सवलतीत विक्री करण्यात येत आहे़ महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह देशभरातील महापुरुषांची चरित्रे उपलब्ध झाली आहेत़ ललित साहित्य, कथा, कादंबऱ्या तसेच लहान मुलांचीही पुस्तके स्टॉलवरुन दिसून आली़