शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

मनरेगा कामांसाठी मजुरांचा रास्ता रोको

By admin | Updated: April 24, 2015 00:36 IST

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने गुरूवारी राजूर-औरंगाबाद मार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये वादही झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.लाल बावटाच्या वतीने यापूर्वी २१ एप्रिल रोजी तहसीलदारांना मनरेगाच्या कामांची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. कामे अकुशलमार्फत न होता, ती कुशल पद्धतीने होत असल्याचेही त्यात नमूद केले होते.दाभाडी येथील बांधबंदिस्ताचे काम मजुरांमार्फत होणे आवश्यक असताना ते ट्रॅक्टरने सुरू असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने लाल बावटाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दाभाडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. ज्या गावात मजुरांची संख्या अधिक आहे, त्या गावात यंत्रबंदी करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मागे घ्यावे, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये काहीसा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले. याबाबत आंदोलकांच्या म्हणण्यानुसार रास्ता रोको सुरू झाल्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी निवेदन घेण्याासाठी तेथे आले नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी येथे येऊन निवेदन स्वीकारावे, हीच आमची मागणी होती. पोलिसांनी ही मागणी धुडकावली. त्यामुळे पोलिसांसमवेत वादावादी झाली. पोहेकॉ. रामदास शिलवंत यांच्या फिर्यादीवरुन मारोती खंदारे, भाऊसाहेब जैवाळ, बाबाराव पाटोळे, अनिल गायकवाड, शे. शहारुख शे.गफार आदीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की, कार्यालयाबाहेर जाऊन निवेदन स्वीकारणे बंधनकारक नाही. तरीही आमच्या कार्यालयातील मंडळ अधिकारी आंदोलनस्थळी गेले होते. ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या कामांबद्दल विचारणा केली असता, तहसीलदार क्षीरसागर म्हणाले, कुशल-अकुशलचे प्रमाण ६०:४० याप्रमाणे आहे. ते साध्य करण्यासाठी काही कामे यंत्राद्वारे करावी लागतात. मजुरांनी नमूना क्रमांक ४ नुसार कामाची मागणी केल्यास त्यांना अन्य ठिकाणची कामे देता येतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.