शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा कामांसाठी मजुरांचा रास्ता रोको

By admin | Updated: April 24, 2015 00:36 IST

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने

बदनापूर : दाभाडी येथे मनरेगाच्या कामांसाठी मजुरांची मागणी असतानाही ही कामे ट्रॅक्टरने सुरू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने गुरूवारी राजूर-औरंगाबाद मार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये वादही झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.लाल बावटाच्या वतीने यापूर्वी २१ एप्रिल रोजी तहसीलदारांना मनरेगाच्या कामांची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. कामे अकुशलमार्फत न होता, ती कुशल पद्धतीने होत असल्याचेही त्यात नमूद केले होते.दाभाडी येथील बांधबंदिस्ताचे काम मजुरांमार्फत होणे आवश्यक असताना ते ट्रॅक्टरने सुरू असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने लाल बावटाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दाभाडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. ज्या गावात मजुरांची संख्या अधिक आहे, त्या गावात यंत्रबंदी करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मागे घ्यावे, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये काहीसा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेतले. याबाबत आंदोलकांच्या म्हणण्यानुसार रास्ता रोको सुरू झाल्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी निवेदन घेण्याासाठी तेथे आले नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी येथे येऊन निवेदन स्वीकारावे, हीच आमची मागणी होती. पोलिसांनी ही मागणी धुडकावली. त्यामुळे पोलिसांसमवेत वादावादी झाली. पोहेकॉ. रामदास शिलवंत यांच्या फिर्यादीवरुन मारोती खंदारे, भाऊसाहेब जैवाळ, बाबाराव पाटोळे, अनिल गायकवाड, शे. शहारुख शे.गफार आदीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की, कार्यालयाबाहेर जाऊन निवेदन स्वीकारणे बंधनकारक नाही. तरीही आमच्या कार्यालयातील मंडळ अधिकारी आंदोलनस्थळी गेले होते. ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या कामांबद्दल विचारणा केली असता, तहसीलदार क्षीरसागर म्हणाले, कुशल-अकुशलचे प्रमाण ६०:४० याप्रमाणे आहे. ते साध्य करण्यासाठी काही कामे यंत्राद्वारे करावी लागतात. मजुरांनी नमूना क्रमांक ४ नुसार कामाची मागणी केल्यास त्यांना अन्य ठिकाणची कामे देता येतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.