शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2017 00:26 IST

जालना : शेतकरी संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी जालना, राजूर, टेंभुर्णी येथील बाजारात भाजीपाला विक्री बंद करून विक्रेत्यांना परतवण्याचा प्रयत्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. राजुरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर जालन्यात बाजारात राडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जुना जालन्यातील रेल्वे स्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार बंदची हाक संभाजी ब्रिगेडने दिली होती. यास प्रतिसाद देत पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणलाच नाही. पाच वर्षांपासून भरणाऱ्या या बाजारात पंचक्रोशीतून भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी आणि शहरातील नोकरदार वर्ग यांचे एक आपुलकीचे नाते तयार झाले आहे. सकाळीच सहावाजेपासून दिसणारी शेतकऱ्यांची लगबग आज पाहायला मिळाली नाही. बाजारात ज्या जागेवर ग्रामीण शेतकरी बसतात, तिथे शहरातील भाजीविके्रेते बसलेले दिसल्यामुळे नेहमी बाजारात येणाऱ्यांनी याबाबत आवर्जून विचारणा केली. दरम्यान, बाजार बंदची हाक दिल्यानंतरही दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांना संभाजी ब्रिगेडचे संतोष गाजरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत परतवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोनि. बाळासाहेब पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाजारात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.संपकरी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यामुळे ग्रामीण भागात आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. राजूरच्या रविवार बाजारात आजूबाजूच्या ३५ ते ४० गावांमधून शेतकरी, व्यापारी व नागरिक खरेदी-विक्रीसाठी येतात. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी सकाळी हा आठवडे बाजार बंद केला. मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी आलेला भाजीपाला फेकून दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी दूध रस्त्यावर फेकून सरकार विरोधी घोषणा दिल्या. काही व्यापाऱ्यांनी दुपारनंतर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुकाने लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यास तीव्र विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करा, शेतमालास हमी भाव द्यावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलनात गजानन बंगाळे, सदाशिव जायभाये, निवृत्ती शेवाळे, बळीराम पुंगळे, रावसाहेब मालुसरे, विष्णू सानप, काकासाहेब साबळे, रमेशअप्पा रेनगाडे, वैजिनाथ ढोरकुले, भारत मगरे, राजू जगताप, धनराज राठोड, रमेश राठोड, जयसिंंग राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी बाजारात विक्रीस आलेला भाजीपाला शेतकऱ्यांनी विकू दिला नाही. धान्य मालाची मंदावलेली आवक व हमाल, मापाडी संघटनेने ठेवलेला बंद यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट पाहायला मिळाला.