शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2017 00:26 IST

जालना : शेतकरी संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी संपाची धार अधिक तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी जालना, राजूर, टेंभुर्णी येथील बाजारात भाजीपाला विक्री बंद करून विक्रेत्यांना परतवण्याचा प्रयत्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. राजुरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर जालन्यात बाजारात राडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जुना जालन्यातील रेल्वे स्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार बंदची हाक संभाजी ब्रिगेडने दिली होती. यास प्रतिसाद देत पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणलाच नाही. पाच वर्षांपासून भरणाऱ्या या बाजारात पंचक्रोशीतून भाजीपाला विक्रीसाठी आणणारे शेतकरी आणि शहरातील नोकरदार वर्ग यांचे एक आपुलकीचे नाते तयार झाले आहे. सकाळीच सहावाजेपासून दिसणारी शेतकऱ्यांची लगबग आज पाहायला मिळाली नाही. बाजारात ज्या जागेवर ग्रामीण शेतकरी बसतात, तिथे शहरातील भाजीविके्रेते बसलेले दिसल्यामुळे नेहमी बाजारात येणाऱ्यांनी याबाबत आवर्जून विचारणा केली. दरम्यान, बाजार बंदची हाक दिल्यानंतरही दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांना संभाजी ब्रिगेडचे संतोष गाजरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत परतवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोनि. बाळासाहेब पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाजारात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.संपकरी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यामुळे ग्रामीण भागात आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. राजूरच्या रविवार बाजारात आजूबाजूच्या ३५ ते ४० गावांमधून शेतकरी, व्यापारी व नागरिक खरेदी-विक्रीसाठी येतात. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी सकाळी हा आठवडे बाजार बंद केला. मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी आलेला भाजीपाला फेकून दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी दूध रस्त्यावर फेकून सरकार विरोधी घोषणा दिल्या. काही व्यापाऱ्यांनी दुपारनंतर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुकाने लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यास तीव्र विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करा, शेतमालास हमी भाव द्यावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलनात गजानन बंगाळे, सदाशिव जायभाये, निवृत्ती शेवाळे, बळीराम पुंगळे, रावसाहेब मालुसरे, विष्णू सानप, काकासाहेब साबळे, रमेशअप्पा रेनगाडे, वैजिनाथ ढोरकुले, भारत मगरे, राजू जगताप, धनराज राठोड, रमेश राठोड, जयसिंंग राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी बाजारात विक्रीस आलेला भाजीपाला शेतकऱ्यांनी विकू दिला नाही. धान्य मालाची मंदावलेली आवक व हमाल, मापाडी संघटनेने ठेवलेला बंद यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट पाहायला मिळाला.