शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर थांबविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा ...

औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर थांबवून लगद्यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेट्‌स) वापर करण्याचा निर्णय मनपाने यापूर्वीच घेतला. विटा खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. चार वेळेस निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंपनीने निविदा भरली. कंपनीने सादर केलेल्या विटांची तपासणी पुणे येथे करण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. महापालिकेने तीन दशकांपूर्वी शहरात विद्युत दाहिनीचा प्रयोग केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शंभर टक्के लाकडांचाच वापर करण्यात येतो. शहरातील चार प्रमुख स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचे काम सुरू झाले. झाडांची कत्तल करून लाकडे आणली जात असल्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. प्रदूषण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी लाकडांचा वापर थांबविण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था म्हणून लगद्यापासून तयार विटांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला. शहरात १६ स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात असून, त्याकरिता लाकडांचा वापर होतो. कोरोनात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले होते. बाहेरच्या जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात असल्याने लाकडांचा वापर वाढलेला आहे. लाकडांचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी लगद्यापासून किंवा ऊस, सोयाबीन यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेट्‌स) वापर केला जाणार आहे. त्याकरिता मनपाने निविदा काढली. चार वेळेस निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंपनीने प्रतिसाद दिला. कंपनीने सादर केलेल्या विटांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविदा उघडून वर्क ऑर्डर देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.