शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

राजुरात भारनियमनाच्या विरोधात रास्ता रोको

By admin | Updated: June 12, 2014 01:41 IST

राजूर : तीर्थक्षेत्र राजूर येथील विजेचे भारनियमन खास बाब म्हणून बंद करून कायमस्वरूपी सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी व्यापारी ग्रामस्थांनी दि.११ रोजी राजूर येथे रास्ता रोको केला.

राजूर : तीर्थक्षेत्र राजूर येथील विजेचे भारनियमन खास बाब म्हणून बंद करून कायमस्वरूपी सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी व्यापारी ग्रामस्थांनी दि.११ रोजी राजूर येथे रास्ता रोको केला. यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.अखेर नायब तहसीलदार डोळस यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथे दुपारी अकरा ते तीन व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. तसेच कनिष्ठ अभियंता शंकरवाल यांच्या हलगर्जीपणामुळे राजुरात भारनियमनाव्यतिरिक्त सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी त्रस्त झाले आहेत. तसेच राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे राजुरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारनियमनाला त्रस्त नागरिकांनी रास्ता रोकोचे आयोजन केले होते. सकाळी अकरा वाजता व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून रास्ता रोकोत सहभाग घेतला होता. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे, रामेश्वर टोणपे, डॉ.वैजीनाथ ढोरकुले यांनी आपल्या भाषणातून महावितरण कंपनीने तातडीने भारनियमन बंद करून जनतेचा छळ थांबवावा, अशी मागणी केली. तसेच माजी सभापती शिवाजीराव थोटे यांनी येत्या आठ दिवसांत भारनियमन बंद न झाल्यास वीज उपकेंद्रासमोर ग्रामस्थांसह धरणे आंदोलन करू, असा इशारा दिला. माजी सरपंच रामदास तळेकर यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुठेही भारनियमन नसताना राजूरलाच का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी नायब तहसीलदार एस.जी.डोळस यांना निवेदन देण्यात आले. प्रभारी कनिष्ठ अभियंता पाटील यांनी सदर बाब वरिष्ठांच्या कानावर घालून येत्या आठ दिवसांत राजूर भारनियमनमुक्त करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, राजूर येथील भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.आंदोलनात तुळजा भवानी पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव खरात, माजी सभापती शिवाजीराव थोेटे, जगन्नाथ थोटे, भाऊसाहेब काकडे, उपसरपंच मुसाशेठ सौदागर, विठ्ठलराव टेपले, मुकेश अग्रवाल, सारंगधर बोडखे, डॉ. वैजीनाथ ढोरकुले, रामेश्वर टोपणे, गणेश इगेवार, नरपतसिंंह शेखावत, रामदास तळेकर, भाऊसाहेब भुजंंग, प्रशांत दानवे, सतिशआप्पा दारूवाले, पुुुंडलिकराव पुंगळे, बबन सहाने, माधव जायभाये यांच्यासह नागरिक, व्यापारी मोठया संंख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)सकाळी अकरा वाजता व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून रास्तारोकोत सहभाग घेतला होता. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे, रामेश्वर टोणपे, डॉ.वैजीनाथ ढोरकुले यांनी आपल्या भाषणातून महावितरण कंपनीने तातडीने भारनियमन बंद करून जनतेचा छळ थांबवावा, अशी मागणी केली. महावितरणकडूनही याबाबतीत वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. भारनियमनामुळे भाविकांसह ग्रामस्थांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.