शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

कोटला कॉलनीची परवड थांबेना

By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचंड उदासीनतेमुळे कोटला कॉलनीतील घरांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचंड उदासीनतेमुळे कोटला कॉलनीतील घरांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. घरांच्या दुरुस्तीसाठी रहिवाशांनी सेवा केंद्रात तक्रार करावी किंवा निवासस्थान दुरुस्त करून द्या, असा अर्ज करावा, अशी सूचना २०१२ मध्ये केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तक्रारी करूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.कोटला कॉलनी येथे ३७ इमारतींमध्ये २२२ निवासस्थाने आहेत. काही घरे गळत आहेत, तर डे्रनेजलाईन फुटल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरात गवत आणि तण वाढल्यामुळे घुशींनी मोठमोठी बिळे करून जमीन पोखरून टाकली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आॅक्टोबर २०१२ रोजी निवासस्थानातील दुरुस्ती कळवावी, अशी सूचना काढली होती.‘अर्थ’कारण सेवानिवृत्तीनंतरही ज्यांनी घरे बळकावली आहेत, त्यांना बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे. हे घुसखोर कोणतेही भाडे देत नाहीत. या व्यवहारामागे अर्थकारण असल्याचा संशय आहे.अनधिकृत लोकांचा कब्जाकाही कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही येथेच राहत आहेत. निवृत्तीनंतर नियमांप्रमाणे कर्मचारी तीन महिने राहू शकतो. काही कर्मचारी निवृत्तीनंतर दोन ते आठ वर्षांपासून येथे राहत आहेत. काही घरांमध्ये अनधिकृत लोकही राहत आहेत, असे येथील रहिवाशांनी सांगितले. अनधिकृत लोक ताबा सोडत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना क्वॉर्टर मिळण्यासाठी दोन वर्षे वाट बघावी लागत आहे.घर रिकामे करण्यासाठी १२ कर्मचाऱ्यांना नोटीसनिवृत्तीनंतरही कोटला कॉलनीतील घर न सोडणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना घर रिकामे करण्यासाठी २ जुलै २०१४ रोजी शेवटची नोटीस देण्यात आली असल्याचे सेवा केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले.गवत वाढल्याने भीती वाटतेकाही घरांना गळती लागली असून, ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याचे पाईपही अनेक ठिकाणी फुटले त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. -संगीता सुंब्रेकुटुंबाचे आरोग्य धोक्यातपरिसरात साचलेला कचरा आणि फुटलेल्या ड्रेनेजमुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने परिसराची नियमित स्वच्छता आणि निवासस्थानाची दुरुस्ती करावी. - साधना कटारे समस्यांचा विळखापाणीटंचाई, अस्वच्छता, फुटलेली ड्रेनेज लाईन, वाढलेले गवत, असे अनेक प्रश्न येथे असून, या प्रश्नांना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. रोज नवा प्रश्न समोर उभा ठाकतो आहे. संबंधितांना याची जाणीव आहे की, नाही काही कळतच नाही.- मुग्धा दिवाणजी