शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST

सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

सेनगाव : अर्धवट कामामुळे जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना सहा वर्षापासून बंद आहे. गावात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासन कुठलीच उपाययोजना करीत नसल्याने सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.सावरखेडा येथे २७ लाख रुपये निधी खर्च करीत जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेचे काम सहा वर्षांपूर्वी करण्यात आले. संबंधितांनी निधीची उचल केली; परंतु नळ योजनेचे काम अर्धवट केल्याने या योजनेचा गावाला अद्यापपर्यंत कुठलाच फायदा झाला नाही. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असताना कुठल्याच स्वरुपाच्या उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी मनसेचे पंचायत समिती सदस्य विकास शिंदे यांच्या नेतृत्वासाठी ग्रामस्थांनी सावरखेडा पाटीवर ११ ते १ या दरम्यान दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सेनगाव-रिसोड राज्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांची बीडीओ पंकज राठोड यांनी भेट घेवून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या आंदोलनात पं.स. सदस्य शिंदे यांच्यासह सरपंच गजानन कुहिटे, प्रकाश पाटील, भागवत मुढे, केशव पवार, नारायण आवटे, संतोष डाखुरे, संतोष नरवाडे, रामेश्वर गव्हाणे, गजानन आवटे, एकनाथ मुकीर, विजय धाकतोडे, सुनील शिंदे, प्रवीण शिंदे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)