शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

ईएसआय कामगार रुग्णांची हेळसांड थांबवा

By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST

वाळूज महानगर : राज्य कामगार विमा योजनेच्या लाखो कामगार व रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड होत आहे

वाळूज महानगर : राज्य कामगार विमा योजनेच्या लाखो कामगार व रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड होत आहे. या कामगार रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राज्य विमाधारक कामगार संघटनेने आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे केली आहे.राज्य कामगार विमा योजनेचे शहरात १०० खाटांचे रुग्णालय असून, तेथे अनेक सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स गंभीर आजारी रुग्णांवर व्यवस्थितपणे उपचार न करता त्यांना घाटी रुग्णालयात जायचा सल्ला देतात. या रुग्णालयात रोज तपासणी व उपचारांसाठी जवळपास ७०० ते ८०० रुग्ण येतात. तरीही केवळ तीन डॉक्टर्स उपलब्ध आहेत. याविषयी सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे कामगारांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना अडचणी सांगितल्या.तीन कोटींची बिले प्रलंबितआम्ही खाजगी रुग्णालयात उपचारांवर केलेला खर्च आम्हाला त्वरित दिला जात नसल्यामुळे आम्हाला उधार-उसनवारी तसेच कर्ज काढावे लागत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जवळपास १ हजार ५०० कामगारांची तब्बल ३ कोटी रुपयांची बिले कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.शेट्टी यांनी रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून, इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कामगार प्रतिनिधींची बैठक मुंबईत आयोजित केली जाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.राज्य कामगार विमा योजनेचे केंद्रीय स्तरावरील महामंडळाकडे हस्तांतर करावे, राज्य कामगार विमा रुग्णालयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, रुग्णालयात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी, गंभीर रुग्णांना उपचारासाठी घाटीत न पाठविता टायअप रुग्णालयात पाठविण्यात यावे, अकोला येथील स्थलांतरित सेवा रुग्णालय चितेगाव येथे सुरू करावे, कामगारांनी प्रलंबित देयके निकाली काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी आदी मागण्यांचे निवेदन राज्य कामगार विमाधारक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रकाश जाधव, किशोर सरोदे, राजू डोईफोडे, संतोष दळवी, गोविंद सोलपुरे यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना दिले.