शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

आता बस्स् ! मायबाप सरकार निर्बंध उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही ...

औरंगाबाद : औरंगाबादेत दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही रोज ४ च्या आत घरात आणि शनिवारी, रविवारी लाॅकडाऊन, अशी व्यापाऱ्यांची स्थिती झाली आहे. परिणामी, २० ते ३० टक्क्यांवर व्यवसाय आला आहे. पुण्यात निर्बंध कमी करण्याचे संकेत मिळतात, मग औरंगाबादेत का नाही, असा सवाल उपस्थित करीत औरंगाबादेतील निर्बंध उठवा, अशी मागणी आता व्यापारी, व्यावसायिक आणि कामगारांतून जोर धरत आहे.

तिसऱ्या लाटेचे आणि डेल्टा प्लसचे संकट उभे राहिल्यानंतर नियमावली बनवण्यात आली आणि त्यामध्ये बाजारपेठेवर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. याविषयी व्यापाऱ्यांनी स्थानिक प्रशासन, पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन देऊन बाजारपेठेची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्याची आणि शनिवारी, रविवारी बाजारपेठ उघडी ठेवण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. डेल्टा प्लसचा कोणताही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. मात्र, तरीही विविध प्रकारचे निर्बंध लावून व्यापारी, त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार आणि कुटुंबीयांना वेठीस धरले जात आहे. गंभीर परिस्थिती नसतानाही व्यापारी, कामगारांच्या पोटावर पाय दिला जात असल्याची ओरड होत आहे. परंतु आता निर्बंध उठविले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

पुणे सुरु होत असेल तर औरंगाबादही सुरु करावे

पुण्यातील निर्बंध कमी करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले. तेथे संध्याकाळी ७ पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची मुभा राहणार आहे. औरंगाबादचा पाॅझिटिव्हिटी रेट पुण्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पुणे सुरु होणार असेल तर औरंगाबादही ७ वाजेपर्यंत सुरु ठेवले पाहिजे. शनिवारी, रविवारीही बाजारपेठ खुली पाहिजे. पाॅझिटिव्हिटी रेट वाढला नाही तर पूर्ण निर्बंध शिथिल केले पाहिजे.

- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

------

६० टक्के व्यवसायाचे नुकसान

व्यवसाय हा सायंकाळी आणि शनिवारी, रविवारीच असतो. परंतु निर्बंधांमुळे ६५ टक्के व्यवसाय बुडत आहे. ज्या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुग्ण आढळत आहेत, तेथे निर्बंध नाही. पण, आपल्याकडे २० ते २५ रुग्ण आढळत असतानाही निर्बंध आहे. शनिवारी, रविवारी दुकाने बंद ठेवावी लागतात. त्यामुळे नोकरदारांना खरेदीही करता येत नाही. त्यामुळे निर्बंध उठवले पाहिजे.

- विनोद लोया, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

------

शहराबाहेरील ग्राहकांची पाठ

शहराबाहेरून येणारा ग्राहक निर्बंधामुळे शहरात येत नाही. त्यामुळे उलाढाल ठप्प होत आहे. कामगार रात्री ८ वाजेपर्यंत काम करीत असे. पण आता ४ तास कमी झाले आहे. शनिवार, रविवारी दुकाने उघडता येत नाही. त्यामुळे कामगारांच्या वेतनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान हाेत आहे. त्यामुळे निर्बंध हटविले पाहिजे.

- संतोष कावले, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा ऑटोमोबाईल ॲण्ड टायर डिलर्स असोसिएशन