शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता बस्स् ! मायबाप सरकार निर्बंध उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही ...

औरंगाबाद : औरंगाबादेत दररोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचेही प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही रोज ४ च्या आत घरात आणि शनिवारी, रविवारी लाॅकडाऊन, अशी व्यापाऱ्यांची स्थिती झाली आहे. परिणामी, २० ते ३० टक्क्यांवर व्यवसाय आला आहे. पुण्यात निर्बंध कमी करण्याचे संकेत मिळतात, मग औरंगाबादेत का नाही, असा सवाल उपस्थित करीत औरंगाबादेतील निर्बंध उठवा, अशी मागणी आता व्यापारी, व्यावसायिक आणि कामगारांतून जोर धरत आहे.

तिसऱ्या लाटेचे आणि डेल्टा प्लसचे संकट उभे राहिल्यानंतर नियमावली बनवण्यात आली आणि त्यामध्ये बाजारपेठेवर वेळेचे निर्बंध आणण्यात आले. याविषयी व्यापाऱ्यांनी स्थानिक प्रशासन, पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन देऊन बाजारपेठेची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्याची आणि शनिवारी, रविवारी बाजारपेठ उघडी ठेवण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. डेल्टा प्लसचा कोणताही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. मात्र, तरीही विविध प्रकारचे निर्बंध लावून व्यापारी, त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार आणि कुटुंबीयांना वेठीस धरले जात आहे. गंभीर परिस्थिती नसतानाही व्यापारी, कामगारांच्या पोटावर पाय दिला जात असल्याची ओरड होत आहे. परंतु आता निर्बंध उठविले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

पुणे सुरु होत असेल तर औरंगाबादही सुरु करावे

पुण्यातील निर्बंध कमी करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले. तेथे संध्याकाळी ७ पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची मुभा राहणार आहे. औरंगाबादचा पाॅझिटिव्हिटी रेट पुण्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पुणे सुरु होणार असेल तर औरंगाबादही ७ वाजेपर्यंत सुरु ठेवले पाहिजे. शनिवारी, रविवारीही बाजारपेठ खुली पाहिजे. पाॅझिटिव्हिटी रेट वाढला नाही तर पूर्ण निर्बंध शिथिल केले पाहिजे.

- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

------

६० टक्के व्यवसायाचे नुकसान

व्यवसाय हा सायंकाळी आणि शनिवारी, रविवारीच असतो. परंतु निर्बंधांमुळे ६५ टक्के व्यवसाय बुडत आहे. ज्या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुग्ण आढळत आहेत, तेथे निर्बंध नाही. पण, आपल्याकडे २० ते २५ रुग्ण आढळत असतानाही निर्बंध आहे. शनिवारी, रविवारी दुकाने बंद ठेवावी लागतात. त्यामुळे नोकरदारांना खरेदीही करता येत नाही. त्यामुळे निर्बंध उठवले पाहिजे.

- विनोद लोया, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

------

शहराबाहेरील ग्राहकांची पाठ

शहराबाहेरून येणारा ग्राहक निर्बंधामुळे शहरात येत नाही. त्यामुळे उलाढाल ठप्प होत आहे. कामगार रात्री ८ वाजेपर्यंत काम करीत असे. पण आता ४ तास कमी झाले आहे. शनिवार, रविवारी दुकाने उघडता येत नाही. त्यामुळे कामगारांच्या वेतनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान हाेत आहे. त्यामुळे निर्बंध हटविले पाहिजे.

- संतोष कावले, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा ऑटोमोबाईल ॲण्ड टायर डिलर्स असोसिएशन