शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाचालकांची दुकानदारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 01:01 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६० वर्षे करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे संस्थाचालकांची दुकानदारी बंद होणार आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून ६० वर्षे करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे संस्थाचालकांची दुकानदारी बंद होणार आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २५ हून अधिक प्र्राध्यापकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहे. राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून पुन्हा ६० वर्षे करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. शासनाच्या निर्णयाचे विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना तसेच नेट सेट संघर्ष कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे अनेक संस्थाचालकांची अडचण झाली आहे. ६२ वयापर्यंत निवृत्तीसाठी वाढ मिळविण्यासाठी प्राध्यापकांच्या निवृत्तीचे प्रस्ताव संस्थाचालकांमार्फत जात असत. संस्थाचालक हे प्रस्ताव पाठवत असताना प्राध्यापकांकडून किमान ३ ते ४ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षे मुदतवाढ मिळाल्यास वार्षिक किमान २५ लाख आणि कमाल ३५ लाखांपर्यंत रक्कम मिळत होती. यातील अनेक प्राध्यापक मुदतवाढीसाठी पैसे खर्च करीत असल्याचे चित्र आहे. विद्यापीठात खळबळ दरम्यान, विद्यापीठात ६० वर्षे वयानुसार निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या सुमारे २५ हून अधिक प्राध्यापकांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे या प्राध्यापकांना साठाव्या वर्षीच निवृत्त व्हावे लागणार आहे. यामध्ये एका विभागातील पाच प्राध्यापक आहेत. विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचे निवृत्तीच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव गेले होते. मात्र ते प्रस्तावही आता मंजूर होणार नाहीत. शासनाच्या नव्या निर्णयामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यापीठातील तसेच महाविद्यालयीन प्राध्यापकांत खळबळ उडाली आहे. नवृत्तीचे वय कमी करण्याच्या निर्णयाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी टीचर्स आॅर्गनायझेशन (बामुक्टो) चे जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड म्हणाले की, तरुणांमध्ये असणाऱ्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चांगला आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील एका प्राध्यापकाच्या पगारात दोन प्राध्यापकांचा खर्च भागू शकतो, असेही डॉ. राठोड म्हणाले.