शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

डीपीडीसीतून महापालिकेला निधी मिळणे बंद

By admin | Updated: September 6, 2016 01:04 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील अ, ब, क दर्जा असलेल्या महापालिकांना डीपीडीसीमधून निधी मिळणार नाही.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील अ, ब, क दर्जा असलेल्या महापालिकांना डीपीडीसीमधून निधी मिळणार नाही. ‘ड’ वर्ग महापालिका, नगर परिषदांना डीपीडीसीमधून निधी देता येईल. युती शासनाच्या या निर्णयामुळे ‘क’ दर्जा असलेल्या महापालिकांना बराच आर्थिक फटका बसणार आहे. पूर्वी महापालिकांना कोट्यवधी रुपये विकासकामांसाठी मिळत होते.औरंगाबाद महापालिकेला अलीकडेच प्रमोशन देण्यात आले आहे. ‘ड’ वर्गातून मनपाचा ‘क’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. १६ मे २०१६ रोजी राज्य शासनाने घेतलेल्या एका निर्णयानुसार मनपाला डीपीडीसीमधून एक रुपयाही मिळणार नाही. मागील दोन ते तीन वर्षांपासून महापालिकेला डीपीडीसीमधून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत होता. या निधीमुळे अनेक नगरसेवकांना आपल्या वॉर्डांमध्ये विकासकामे करणे शक्य होत होते. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त करणाऱ्या महापालिका आर्थिकदृष्ट्या बऱ्याच प्रगत आहेत. त्यांना डीपीडीसीच्या निधीचीही गरज नाही. फक्त ‘क’ दर्जा प्राप्त असलेल्या महापालिका फारशा आर्थिकदृष्ट्या प्रगत नाहीत. शिवसेना-भाजप युती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे छोट्या महापालिकांचे संकट अधिक वाढले आहे. मागील काही वर्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेला डीपीडीसीमधून बऱ्यापैकी आर्थिक रक्कम मिळाली आहे. दोन वर्षांमध्ये तर सुमारे १८ कोटींपर्यंत निधी मिळाला आहे. शहरातील विकासकामांसाठी हा निधी संजीवनी देणारा ठरत आहे. मागील वर्षी डीपीडीसीने कचरा उचलण्यासाठी मनपाला रिक्षा खरेदी करावी म्हणून १ कोटी १० लाखांचा निधी दिला. ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी रॉडिंग मशीन खरेदीसाठी १ कोटींचा निधी दिला आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम हॉल बांधण्यात येत आहे. त्यासाठीही डीपीडीसीने मनपाला ३ कोटींची आर्थिक मदत केली आहे. कटकटगेट येथे दोन्ही बाजूने रस्ता करण्यासाठीही डीपीडीसीने निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री रामदास कदम यांच्या कार्यकाळात बऱ्यापैकी निधी मिळाला. त्यापूर्वी आघाडी सरकारमध्येही मनपाला ११ कोटी ५८ लाखांचा निधी मिळाला होता.