शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

जालना रेल्वेस्थानकावरील मालवाहतूक बंद

By admin | Updated: June 11, 2014 00:34 IST

जालना - माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे.

जालना - रेल्वे वॅगनमधून माल उतरविण्यास नऊ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास लागणाऱ्या डेमरेज (दंड) चे दर रेल्वे प्रशासनाने दुपटीने वाढविल्याने दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी रेल्वेद्वारे मालवाहतूक बंद केली आहे. त्याचा फटका हमाल-मापाडींनाही बसला असून त्यांची उपासमार होत आहे.रेल्वे प्रशासनाने डेमरेजचे दर दुप्पट केल्याने व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून रेल्वे वॅगनद्वारे मालाची ने-आण करणे बंद केले आहे. त्यामुळे जालना मालधक्क्यावर दोन दिवसांपासून कोणतीही मालवाहतूक करणारी रेल्वे आली नाही. रेल्वे वॅगनद्वारे आलेला माल मालधक्क्यावर उतरविण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना ४ तासांची वेळ मर्यादा दिली जाते. ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागल्यास डेमरेज द्यावा लागतो. यापूर्वी डेमरेज प्रतिवॅगन प्रतितास १५० रुपये आकारले जात होते. मात्र काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने डेमरेजच्या दरांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता ४ तासांपेक्षा अधिक वेळ लागल्यास ३०० रुपये प्रतितास इतका डेमरेज आकारला जातो. डेमरेजचे दर वाढविल्यामुळे काही व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. या विरोधामुळे संबंधित व्यापाऱ्यांनी मालाची ने-आण करणे बंद केले आहे. परिणामी, दोन दिवसांत एकही मालगाडी मालधक्क्यावर आली नाही. या मालधक्क्यावर १५० हमाल रोजंदारी करतात. मात्र मालवाहतूक बंद झाल्याने दोन दिवसांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. त्याचप्रमाणे ६० ट्रकचालकांचेही काम बंद झाले आहे. त्यामुळे ट्रक या धक्क्यासमोरच उभ्या आहेत. ही मालवाहतूक केव्हा सुरू होईल, हे निश्चित नसल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाकडून मात्र इन्कार मालधक्क्यावरील काही हमालांशी संपर्क साधला असता तीन-चार दिवसांपासून मालवाहतूक बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमची उपासमार होत असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक रेल्वे प्रशासनाने मालवाहतूक बंद असल्याबद्दल इन्कार केला आहे. स्थानकप्रमुख विजयसिंग वळवी म्हणाले की, मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. ती बंद नाही, असा दावा त्यांनी केला.गव्हाचा माल येणार रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालधक्क्यावर मालाची ने-आण करण्याचे काम बंद झालेले नाही. तीन दिवसांपूर्वी येथे खताचा माल उतरविण्यात आला होता. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत गव्हाचा माल जालना रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.