शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

पथकावर दगडफेक

By admin | Updated: September 8, 2015 00:44 IST

औरंगाबाद : शिवाजीनगर - रामनगर रस्त्यात येणारी घरे पाडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सोमवारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ पोहोचले.

औरंगाबाद : शिवाजीनगर - रामनगर रस्त्यात येणारी घरे पाडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक सोमवारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ पोहोचले. मात्र, संतप्त नागरिकांनी पाडापाडीच्या कारवाईला तीव्र विरोध करून जेसीबीवर दगडफेक केली. त्यामुळे मनपाला ही कारवाई थांबवावी लागली. यानंतरही स्थानिक नागरिकांनी दिवसभर येथे ठिय्या आंदोलन केले. आधी पर्यायी जागा आणि नंतरच कारवाई करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.मनपाने चार दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजी चौक हा रस्ता मोकळा केला. याठिकाणी दीडशेहून अधिक इमारती भुईसपाट करण्यात आल्या. त्याची धूळ खाली बसवण्यापूर्वी मनपा प्रशासन येथूनच जाणारा शिवाजीनगर-रामनगर हा आणखी एक रस्ता मोकळा करण्यासाठी सरसावले आहे. त्यासाठी शुक्रवारी जयभवानीनगर आणि विश्रांतीनगरात काही ठिकाणी मार्किंग करण्यात आली. शनिवारी मात्र, राहिलेल्या भागात मार्किंग करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतर आज मनपाचे पथक याठिकाणी पाडापाडीच्या कारवाईसाठी पोहोचले. कारवाईला सुरुवात करताच स्थानिक रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला. दगडफेकीनंतर मनपाने पाडापाडीची कारवाई थांबविली, पण त्यानंतरही राहिलेल्या भागात मार्किंगचे काम मात्र सुरूच होते. ४मनपाच्या पथकाने राहिलेल्या भागात मार्किंग पूर्ण केले. या पथकात नगररचना विभागातील उपअभियंता ए. बी. देशमुख, नितीन गायकवाड, काही इमारत निरीक्षक आणि इतरांचा समावेश होता.मार्किंगला आमचा विरोध नाही; परंतु मनपाने आधी एकत्रित पंचनामे करावेत आणि आम्हाला पर्यायी जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. त्याशिवाय आम्ही बुलडोझर चालवू देणार नाही, असे आंदोलनकर्त्यांच्या वतीने भाकपचे शहर सचिव मधुकर खिल्लारे यांनी सांगितले. नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांना भेटून ही कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. पांडे यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे हे पाहणी करतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार आज हे नागरिक मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनसमोरील चौकात सोरमारे यांची वाट बघत थांबले होते. परंतु दुपार झाली तरी जिल्हा प्रशासनाचे कुणीच प्रतिनिधी तिकडे फिरकले नाहीत. उलट मनपाचे पथक पाडापाडीसाठी धडकले. त्यामुळे नागरिक अधिकच संतापले.