शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
3
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
4
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
5
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
6
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
7
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
8
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
9
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
10
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
11
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
12
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
13
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
14
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
15
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
16
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
17
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
18
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
19
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
20
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय; लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण ...

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लस हाच एकमेव उपाय असल्याचे समोर येत आहे. लस घेतल्यानंतर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला अशीही घटना नाही. सध्या लसची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाने आजपर्यंत सर्व व्यापक उपाययोजना केल्या. त्याचा फारसा फरक दिसून आला नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ३ लाख ७१ हजार १०८ नागरिकांना जिल्ह्यात लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. शहरात पहिला डोस घेतल्यानंतर २२, तर दुसरा डोस घेतल्यानंतर १२ जण पॉझिटिव्ह आले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.

पहिल्या डोसनंतर ०.०१३ टक्के पॉझिटिव्ह

पहिला डोस घेतल्यानंतर शहरात २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आणखी बाधित रुग्णांची माहिती समोर आली नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याची धास्ती घेतलेल्यांना आतापर्यंत खूप फायदा झालेला आहे. सामान्य रुग्णांच्या तुलनेत त्यांना फारसा त्रास झाला नाही. विशेष बाब म्हणजे ते आजारातून लवकर बरे झाले.

१,१४, ४९५

आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण.

२,२७५

जणांचा मृत्यू

९७,१९८

कोरोनामुक्त

लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी

कोराेनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांचा एचआरसीटी १८ ते २४ पर्यंत जात आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. लस घेतली असेल तर रुग्ण स्थिर राहतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना विषाणू बाधा पोहोचवत नाही.

पहिला डोस - ३,३१,१८९

दुसरा डोस - ३९,९१९

एकूण लसीकरण - ३,७१,१०८

डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, पूर्वीच्या तुलनेत त्रास फार कमी होता. औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळतो. लसीकरण मोहीम वेगाने सुरू केल्यानंतर शहरात संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.

दोन डोस घेतल्यानंतर फक्त ३४ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार, शहरात जवळपास दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असे एकही उदाहरण आतापर्यंत नाही. त्याचप्रमाणे लस घेतलेले नागरिक अत्यंत कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत.