शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

लसच उपाय; लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण ...

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लस हाच एकमेव उपाय असल्याचे समोर येत आहे. लस घेतल्यानंतर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला अशीही घटना नाही. सध्या लसची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाने आजपर्यंत सर्व व्यापक उपाययोजना केल्या. त्याचा फारसा फरक दिसून आला नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ३ लाख ७१ हजार १०८ नागरिकांना जिल्ह्यात लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. शहरात पहिला डोस घेतल्यानंतर २२, तर दुसरा डोस घेतल्यानंतर १२ जण पॉझिटिव्ह आले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.

पहिल्या डोसनंतर ०.०१३ टक्के पॉझिटिव्ह

पहिला डोस घेतल्यानंतर शहरात २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आणखी बाधित रुग्णांची माहिती समोर आली नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याची धास्ती घेतलेल्यांना आतापर्यंत खूप फायदा झालेला आहे. सामान्य रुग्णांच्या तुलनेत त्यांना फारसा त्रास झाला नाही. विशेष बाब म्हणजे ते आजारातून लवकर बरे झाले.

१,१४, ४९५

आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण.

२,२७५

जणांचा मृत्यू

९७,१९८

कोरोनामुक्त

लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी

कोराेनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांचा एचआरसीटी १८ ते २४ पर्यंत जात आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. लस घेतली असेल तर रुग्ण स्थिर राहतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना विषाणू बाधा पोहोचवत नाही.

पहिला डोस - ३,३१,१८९

दुसरा डोस - ३९,९१९

एकूण लसीकरण - ३,७१,१०८

डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, पूर्वीच्या तुलनेत त्रास फार कमी होता. औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळतो. लसीकरण मोहीम वेगाने सुरू केल्यानंतर शहरात संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.

दोन डोस घेतल्यानंतर फक्त ३४ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार, शहरात जवळपास दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असे एकही उदाहरण आतापर्यंत नाही. त्याचप्रमाणे लस घेतलेले नागरिक अत्यंत कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत.