शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

लसच उपाय; लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण ...

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लस हाच एकमेव उपाय असल्याचे समोर येत आहे. लस घेतल्यानंतर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला अशीही घटना नाही. सध्या लसची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाने आजपर्यंत सर्व व्यापक उपाययोजना केल्या. त्याचा फारसा फरक दिसून आला नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ३ लाख ७१ हजार १०८ नागरिकांना जिल्ह्यात लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. शहरात पहिला डोस घेतल्यानंतर २२, तर दुसरा डोस घेतल्यानंतर १२ जण पॉझिटिव्ह आले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.

पहिल्या डोसनंतर ०.०१३ टक्के पॉझिटिव्ह

पहिला डोस घेतल्यानंतर शहरात २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आणखी बाधित रुग्णांची माहिती समोर आली नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याची धास्ती घेतलेल्यांना आतापर्यंत खूप फायदा झालेला आहे. सामान्य रुग्णांच्या तुलनेत त्यांना फारसा त्रास झाला नाही. विशेष बाब म्हणजे ते आजारातून लवकर बरे झाले.

१,१४, ४९५

आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण.

२,२७५

जणांचा मृत्यू

९७,१९८

कोरोनामुक्त

लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी

कोराेनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांचा एचआरसीटी १८ ते २४ पर्यंत जात आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. लस घेतली असेल तर रुग्ण स्थिर राहतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना विषाणू बाधा पोहोचवत नाही.

पहिला डोस - ३,३१,१८९

दुसरा डोस - ३९,९१९

एकूण लसीकरण - ३,७१,१०८

डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, पूर्वीच्या तुलनेत त्रास फार कमी होता. औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळतो. लसीकरण मोहीम वेगाने सुरू केल्यानंतर शहरात संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.

दोन डोस घेतल्यानंतर फक्त ३४ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार, शहरात जवळपास दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असे एकही उदाहरण आतापर्यंत नाही. त्याचप्रमाणे लस घेतलेले नागरिक अत्यंत कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत.