शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय; लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण ...

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लस हाच एकमेव उपाय असल्याचे समोर येत आहे. लस घेतल्यानंतर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला अशीही घटना नाही. सध्या लसची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासनाने आजपर्यंत सर्व व्यापक उपाययोजना केल्या. त्याचा फारसा फरक दिसून आला नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ३ लाख ७१ हजार १०८ नागरिकांना जिल्ह्यात लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. शहरात पहिला डोस घेतल्यानंतर २२, तर दुसरा डोस घेतल्यानंतर १२ जण पॉझिटिव्ह आले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला किंवा दुसरा डोस घेतलेल्या रुग्णांना फारसा त्रास झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.

पहिल्या डोसनंतर ०.०१३ टक्के पॉझिटिव्ह

पहिला डोस घेतल्यानंतर शहरात २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आणखी बाधित रुग्णांची माहिती समोर आली नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याची धास्ती घेतलेल्यांना आतापर्यंत खूप फायदा झालेला आहे. सामान्य रुग्णांच्या तुलनेत त्यांना फारसा त्रास झाला नाही. विशेष बाब म्हणजे ते आजारातून लवकर बरे झाले.

१,१४, ४९५

आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण.

२,२७५

जणांचा मृत्यू

९७,१९८

कोरोनामुक्त

लस महत्त्वाचीच, मृत्यूचा धोका कमी

कोराेनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांचा एचआरसीटी १८ ते २४ पर्यंत जात आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. लस घेतली असेल तर रुग्ण स्थिर राहतो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना विषाणू बाधा पोहोचवत नाही.

पहिला डोस - ३,३१,१८९

दुसरा डोस - ३९,९१९

एकूण लसीकरण - ३,७१,१०८

डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, पूर्वीच्या तुलनेत त्रास फार कमी होता. औषधोपचाराला चांगला प्रतिसाद मिळतो. लसीकरण मोहीम वेगाने सुरू केल्यानंतर शहरात संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.

दोन डोस घेतल्यानंतर फक्त ३४ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख ७१ हजार, शहरात जवळपास दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असे एकही उदाहरण आतापर्यंत नाही. त्याचप्रमाणे लस घेतलेले नागरिक अत्यंत कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत.