शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

स्टेशनवर आंघोळ पडली महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 00:06 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील. याचाच प्रत्यय पर्यटन आणि देवदर्शनासाठी आलेल्या ४० प्रवाशांना बुधवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आला.पर्यटन आणि देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने बुधवारी सकाळी ४० प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी रेल्वे रुळाजवळ पाईपलाईन आहे. सकाळची वेळ असल्याने यातील प्रवाशांनी थेट प्लॅटफॉर्मवरच आंघोळ करणे सुरू केले. काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुण्यास सुरुवात केली. पाहता पाहता प्लॅटफॉर्म सांडपाण्याने भरून गेला. प्रवाशांनी कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच टाकले होते. त्यामुळे रेल्वेस्टेशनला धोबी घाटाचे स्वरूप आले होते. हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या कानी पडला. त्यांनी तात्काळ धाव घेतली. तीव्र पाणीटंचाई असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी केली जात असल्याबद्दल त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आंघोळ करून पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० याप्रमाणे ४० जणांकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.रेल्वेला पैसे मोजून प्रवासासाठी निघालो होतो. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर काहीही करता येते, असाच या प्रवाशांचा समज होता. दंडाची कल्पना असती तर हॉटेल, लॉजमध्ये गेलो असतो. तेथे कमी रक्कम लागली असती, असे काही प्रवाशांनी म्हटले.