शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

स्टेशनवर आंघोळ पडली महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 00:06 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही चुकूनही पाण्याची नासाडी केली तर दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे. त्यातही जर चक्क आंघोळ केली तर त्यासाठी थेट पाचशे रुपये मोजावे लागतील. याचाच प्रत्यय पर्यटन आणि देवदर्शनासाठी आलेल्या ४० प्रवाशांना बुधवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आला.पर्यटन आणि देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने बुधवारी सकाळी ४० प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी रेल्वे रुळाजवळ पाईपलाईन आहे. सकाळची वेळ असल्याने यातील प्रवाशांनी थेट प्लॅटफॉर्मवरच आंघोळ करणे सुरू केले. काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुण्यास सुरुवात केली. पाहता पाहता प्लॅटफॉर्म सांडपाण्याने भरून गेला. प्रवाशांनी कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच टाकले होते. त्यामुळे रेल्वेस्टेशनला धोबी घाटाचे स्वरूप आले होते. हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या कानी पडला. त्यांनी तात्काळ धाव घेतली. तीव्र पाणीटंचाई असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी केली जात असल्याबद्दल त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आंघोळ करून पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० याप्रमाणे ४० जणांकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.रेल्वेला पैसे मोजून प्रवासासाठी निघालो होतो. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर काहीही करता येते, असाच या प्रवाशांचा समज होता. दंडाची कल्पना असती तर हॉटेल, लॉजमध्ये गेलो असतो. तेथे कमी रक्कम लागली असती, असे काही प्रवाशांनी म्हटले.