शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मराठा मोर्चासंदर्भात रविवारी औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक

By admin | Updated: October 8, 2016 01:16 IST

औरंगाबाद : मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या विक्रमी मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी औरंगाबादमध्ये राज्यव्यापी नियोजन बैठक होत आहे.

औरंगाबाद : मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या विक्रमी मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी औरंगाबादमध्ये राज्यव्यापी नियोजन बैठक होत आहे. एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात सकाळी १० वाजता ही बैठक सुरू होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा सुरू आहे. मुंबईत ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये औरंगाबादमध्ये बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ९ आॅक्टोबर रोजी शहरात बैठक होत आहे. ही बैठक आयोजित करीत असताना प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांशी चर्चा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यातील आयोजकांनी आपापल्या जिल्ह्यांत बैठका घेऊन औरंगाबादच्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून केवळ अकरा प्रतिनिधी पाठविण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीमध्ये मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या विक्रमी मोर्चासंदर्भात तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात एकमत करण्यात येऊन त्याबाबत एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल सर्वांसमक्ष वाचून दाखविण्यात येईल. या बैठकीतच मुंबईतील मोर्चाच्या तारखेबाबत एकमत करण्यात येणार आहे. बैठकीमध्ये विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आयोजकांतर्फे सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची नावे आधी कळविण्यात आली आहेत. त्यानुसारच बैठकीचे नियोजन करण्यात आले असल्याचे बैठकीच्या समन्वयकांनी म्हटले आहे. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती नंतर माध्यमांना दिली जाणार आहे. दरम्यान, या बैठकीत मुंबई येथील मोर्चाची अंतिम तारीख ठरण्याची शक्यता आहे.