शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य गुन्हा अन्वेषनचे दोषारोपपत्र अखेर रद्द

By admin | Updated: July 29, 2014 01:13 IST

औरंगाबाद : शासनाच्या आदेशाने राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना अधिकाऱ्यांनी तुरुंगात असलेल्या आरोपींना साक्षीदार बनविले,

औरंगाबाद : शासनाच्या आदेशाने राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना अधिकाऱ्यांनी तुरुंगात असलेल्या आरोपींना साक्षीदार बनविले, तर साक्षीदारांना आरोपी ठरवून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. ही बाब मृताच्या भावाने खंडपीठासमोर आणताच न्यायालयाने सीआयडीचा तपास बेकायदेशीर ठरवून त्यांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. १६ नोव्हेंबर २००२ रोजी बदनापूर पोलीस ठाण्यात शिवाजी पंखुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा भाऊ रामप्रसाद पंखुले यांचा खून केल्याप्रकरणी लुकस घोरपडे, विष्णू वाघ, विष्णू जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला चालू असताना जालना जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष साहेबराव खरात यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना ३ डिसेंबर २००२ रोजी पत्र लिहून कळवले की, रामप्रसाद पंखुले यांचा खून ज्ञानेश्वर गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, नरहरी पवार यांनीच केला आहे. यास साक्षीदार परमेश्वर, शेख बशीर आहेत. एकतर्फी तपास केला आहे, त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून करावा. हे पत्र मिळाल्यानंतर गृहमंत्री यांनी अ प्रमाणे कार्यवाही करावी असा आदेश दिला. त्या पत्राच्या आधारे कक्ष अधिकारी यांनी २३ जानेवारी २००३ रोजी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक खरात यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची प्रत देऊन तपास करण्याचे शासनाचे आदेश असल्याचे कळविले. त्याआधारे सीआयडीने तपास करून १३ जून २००५ रोजी ६ आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल के ले. यातील चार आरोपी हे पूर्वीच्या आरोपपत्रात साक्षीदार होते, तर पूर्वीच्या ३ आरोपींना साक्षीदार बनविण्यात आले. या सर्व घडामोडींची कल्पना फिर्यादीला होताच त्यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली असता न्यायालयाने दोन्ही केस प्रकरणास अंतरिम स्थगिती दिली. ही याचिका न्या. एस. एस. शिंदे व न्या.पी. आर. बोरा यांच्यासमोर सुनावणीस आली असता याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, कोणत्याही गुन्ह्याचा फेरतपास करता येत नाही. तसेच मंत्रिमहोदयांना पत्र पाठविणारी व्यक्ती ही त्या घटनेची साक्षीदार नाहीत. शासनातर्फे मंत्रिमहोदयांनी फेरतपासाचे आदेश दिले नाही, असे शपथपत्रात नमूद असले तरी कोर्टासमोर आलेल्या सर्व कागदपत्रांच्याआधारे त्यांनीच फेरतपासाचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट होत असल्याचा न्यायालयाने निष्कर्ष नोंदविला. या केसमध्ये सीआयडीने के लेला तपास बेकायदेशीर आहे. केवळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनाच फेरतपासाचे आदेश देण्याचे अधिकार आहे. त्यामुळे सीआयडीने केलेला तपास आणि दाखल केलेले दोषारोपपत्र न्यायालयाने रद्द ठरविले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. व्ही. डी. सपकाळ यांनी बाजू मांडली.