शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

राज्य सरकार अल्पमतातलेच

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : राज्यातील भाजपा सरकार अल्पमतातले असून, ते असंवैधानिक असल्याचा आक्षेप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतला.

औरंगाबाद : राज्यातील भाजपा सरकार अल्पमतातले असून, ते असंवैधानिक असल्याचा आक्षेप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतला. दुष्काळ परिषद संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, १२२ च्या वर या सरकारला कोणत्या व किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारने विश्वास प्रस्ताव संमत करून घेतला पाहिजे. कोणतेही सरकार घटनेची पायमल्ली करणारे नसावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालावे, ही अपेक्षा आहे. हे अल्प मतातले सरकार चालता कामा नये. यासाठी आम्ही राज्यपाल, राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुख्यमंत्री बहुजन असायला हवा होता, या एकनाथ खडसे यांच्या मताशी आपण सहमत आहात का, असे विचारले असता ठाकरे उत्तरले की, शेवटी मुख्यमंत्री कुणाला करावयाचे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न होता; परंतु भाजपावर आरएसएसचा रिमोट कंट्रोल चालतो, हे काही लपून राहिलेले नाही. ज्याने जास्त दिवस चड्डी घातली त्याला त्यांनी मुख्यमंत्री बनविले. एकनाथ खडसे यांनी कदाचित फडणवीस यांच्यापेक्षा कमी दिवस चड्डी घातलेली असावी. एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतीत गेलेले नाहीत. त्यांना शेतीतले ते काय कळणार? म्हणूनच ते पाण्याचा दुष्काळ नाही, असे म्हणू शकतात.सरकारच असे म्हणू लागल्यानंतर लोकांनी पाहावे तरी कुणाकडे? आणि साडेचार हजार कोटी रुपये हे कितीतरी कमी ठरणार आहेत. त्यासाठीही केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे. कोरडवाहू शेतकऱ्यास २५ हजार रुपये व फळबागांसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.