शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

व्यवस्थापकाविना स्टेट बँकेचा कारभार

By admin | Updated: December 5, 2014 00:54 IST

कडा: आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे

कडा: आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आल्यापावली परत जाण्याची वेळ येत आहे. येथील राष्ट्रीयकृत बँकेतही ग्राहकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात सध्या पीक कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, जनधन योजना यासारख्या अनेक कामांसाठी शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने बँकेत येतात. मात्र व्यवस्थापकच नसल्याने अनेक कामे खोळंबत आहेत. तर येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांवरही अंकुश न राहिल्याने ग्राहकांना आरेरावीची भाषा ऐकून घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँकेत कामापेक्षा तक्रारीच अधिक होत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रश्नाकडे अद्यापर्यंत कोणीच लक्ष दिलेले नाही. पीक कर्जाच्या विविध फाईलसाठी शेतकऱ्यांची बँकेत ये- जा असते.मात्र कर्जाची पुर्तता न होता केवळ शेतकऱ्यांची पायपीटच होत आहे. शेतकऱ्यांची होणारी तारांबळ व आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ केवळ बँकेला मॅनेजर नसल्याने आली आहे. त्यामुळे हा प्रश्न त्वरित सोडवावा व ग्राहकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जि.प. सदस्य रवी ढोबळे यांनी केली आहे. बँकेला त्वरित मॅनेजर मिळाला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन बँकेला छावा संघटनेच्या वतीने कुलूप ठोकणार असल्याचे तालुकाध्यक्ष अशोक वाघुले यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने शैक्षणिक कर्जाची प्रकरणेही निकाली निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. (वार्ताहर)गेल्या तीन महिन्यांपासून येथील स्टेट बँकेच्या शाखेत व्यवस्थापकपदी कोणी नसल्याने बँकेचा कारभार हा प्रभारी व्यवस्थापक यांच्यावरच चालत आहे. वरिष्ठांकडून अद्यापर्यंत कोणतेही लेखी आदेश देण्यात आले नाहीत. सध्या तोंडी आदेशान्वयेच काम पाहत असल्याचे प्रभारी व्यवस्थापक बबन पाचपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.