शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेली रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अमान्य केली आहे. त्यामुळे आता ...

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेली रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अमान्य केली आहे. त्यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा आणि मराठा तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठा आरक्षणाचे मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना केली.

पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात जी रिव्ह्यू पिटिशन करण्यात आली होती, ती गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. याचाच अर्थ असा आहे की, केंद्र सरकारने जी विनंती केली होती, हे अधिकार राज्याला आहेत, ती विनंती न्यायालयाने अमान्य केलेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे अधिकार आता केंद्र सरकारकडे आहेत. याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा किंवा केंद्राचं अधिवेशन येतेय, राज्याचं अधिवेशन येतेय. राज्य सरकाने कायदा करावा. या दोघांनी एकत्रित बसून ठरवावं. मराठा तरुणांना आता न्याय पाहिजे. तो न्याय आम्हाला कधी देईल, कोण देईल, याची प्रतीक्षा आम्हाला आहे. राज्य सरकारच्या वतीने व माझ्या वतीने जे रिव्ह्यू पिटिशनमध्ये इतर मुद्दे घेण्यात आले होते, मागास आयोगाच्या रिपोर्टचा विषय होता, इंदिरा साहनी खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा संबंध नाही, याबाबत कुठलाही निर्णय अजून झालेला नाही. केंद्र सरकारच्या वतीने मात्र जी रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली होती, ती न्यायालयाने नाकारलेली आहे. यामुळे राज्याने केंद्राचा पाठपुरावा करावा व तत्काळ याबाबत निर्णय व्हावा, एवढीच अपेक्षा आमची सर्वांची आहे, असे विनोद पाटील म्हणाले.