शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेली रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अमान्य केली आहे. त्यामुळे आता ...

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेली रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अमान्य केली आहे. त्यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा आणि मराठा तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठा आरक्षणाचे मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना केली.

पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात जी रिव्ह्यू पिटिशन करण्यात आली होती, ती गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. याचाच अर्थ असा आहे की, केंद्र सरकारने जी विनंती केली होती, हे अधिकार राज्याला आहेत, ती विनंती न्यायालयाने अमान्य केलेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे अधिकार आता केंद्र सरकारकडे आहेत. याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा किंवा केंद्राचं अधिवेशन येतेय, राज्याचं अधिवेशन येतेय. राज्य सरकाने कायदा करावा. या दोघांनी एकत्रित बसून ठरवावं. मराठा तरुणांना आता न्याय पाहिजे. तो न्याय आम्हाला कधी देईल, कोण देईल, याची प्रतीक्षा आम्हाला आहे. राज्य सरकारच्या वतीने व माझ्या वतीने जे रिव्ह्यू पिटिशनमध्ये इतर मुद्दे घेण्यात आले होते, मागास आयोगाच्या रिपोर्टचा विषय होता, इंदिरा साहनी खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा संबंध नाही, याबाबत कुठलाही निर्णय अजून झालेला नाही. केंद्र सरकारच्या वतीने मात्र जी रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली होती, ती न्यायालयाने नाकारलेली आहे. यामुळे राज्याने केंद्राचा पाठपुरावा करावा व तत्काळ याबाबत निर्णय व्हावा, एवढीच अपेक्षा आमची सर्वांची आहे, असे विनोद पाटील म्हणाले.