शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

शहरातील पथदिवे सुरू करा

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने विसर्जन मिरवणूक मार्गावर पथदिवे सुरू करून सर्वच खड्डे बुजवावे, असे आवाहन पोलिस प्रशासन, राजकीय पक्ष व गणेश महासंघाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक आय.टी. वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, संतोष पाटील, शंकर विभुते, अजय जगताप, विद्याधर काळे यांच्यासह महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर, कार्याध्यक्षा आयेशाखान मुलानी, मानाच्या गणपतीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार आबड, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, इकबाल पाशा, नगरसेवक शेख माजेदखान, काँगे्रसचे शहराध्यक्ष अ. हाफीज, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, नगरसेविका जयश्री कुलकर्णी, अशोक पवार, राहूल देशपांडे आदींची उपस्थिती होती. यंदाच्यावर्षी विसर्जन मिरवणूक १० तासांची राहणार असून दुपारी २ वाजता मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. रात्री १२ वाजता ही मिरवणूक संपणार आहे. वेळेसंदर्भात प्रथमच नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वांचा सहभाग राहणार आहे. महाप्रसाद व अन्नदान कार्यक्रमाचे नियोजनही यानुसारच करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. नगर पालिकेने शहरातील मिरवणूक मार्गासह सर्वच पथदिवे सुरू करावेत. भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील सर्वच खड्डे तात्काळ बुजवावे, असेही आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मिरवणूक कचेरी रोडवरून मोतीबागेपर्यंत जाणार असून परतणारी वाहने औरंगाबाद चौफुली मार्गावरून परत जातील. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत गणेश विसर्जन मिरवुणकी दरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच करावाच्या उपाययोजनांबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. शंकांचे निसन केले. (प्रतिनिधी)जालना शहर काही महिन्यांपासून अंधारात असल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांमधूनही रोषही व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पथदिवे सुरु करणे अपेक्षित होते. आता विसर्जन मिरवणूकनिमित्ताने पथदिवे सुरु करण्याची मागणी शहरवासियांमधून जोर धरत आहे.