शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहरातील पथदिवे सुरू करा

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने विसर्जन मिरवणूक मार्गावर पथदिवे सुरू करून सर्वच खड्डे बुजवावे, असे आवाहन पोलिस प्रशासन, राजकीय पक्ष व गणेश महासंघाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक आय.टी. वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, संतोष पाटील, शंकर विभुते, अजय जगताप, विद्याधर काळे यांच्यासह महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर, कार्याध्यक्षा आयेशाखान मुलानी, मानाच्या गणपतीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार आबड, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, इकबाल पाशा, नगरसेवक शेख माजेदखान, काँगे्रसचे शहराध्यक्ष अ. हाफीज, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, नगरसेविका जयश्री कुलकर्णी, अशोक पवार, राहूल देशपांडे आदींची उपस्थिती होती. यंदाच्यावर्षी विसर्जन मिरवणूक १० तासांची राहणार असून दुपारी २ वाजता मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. रात्री १२ वाजता ही मिरवणूक संपणार आहे. वेळेसंदर्भात प्रथमच नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वांचा सहभाग राहणार आहे. महाप्रसाद व अन्नदान कार्यक्रमाचे नियोजनही यानुसारच करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. नगर पालिकेने शहरातील मिरवणूक मार्गासह सर्वच पथदिवे सुरू करावेत. भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील सर्वच खड्डे तात्काळ बुजवावे, असेही आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मिरवणूक कचेरी रोडवरून मोतीबागेपर्यंत जाणार असून परतणारी वाहने औरंगाबाद चौफुली मार्गावरून परत जातील. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत गणेश विसर्जन मिरवुणकी दरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच करावाच्या उपाययोजनांबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. शंकांचे निसन केले. (प्रतिनिधी)जालना शहर काही महिन्यांपासून अंधारात असल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांमधूनही रोषही व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पथदिवे सुरु करणे अपेक्षित होते. आता विसर्जन मिरवणूकनिमित्ताने पथदिवे सुरु करण्याची मागणी शहरवासियांमधून जोर धरत आहे.