शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा तोडीस सुरूवात

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

हिंगोली : तालुक्यातील ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडेगाव, साटंबा परिसरात पावसाळ्यातही अजून पाऊस पडलेला नाही.

हिंगोली : तालुक्यातील ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडेगाव, साटंबा परिसरात पावसाळ्यातही अजून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी संत्र्याच्या बागांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यास सुरूवात केली आहे. भांडेगाव येथील श्रीराम नामाजी जगताप या शेतकऱ्याने तीन एकर शेतीमध्ये ८०० संत्र्याच्या झाडाची लागवड केली होती; परंतु निसर्ग पावसाने दगा दिला आणि त्यातच यावर्षी विहिरीची पाणीपातळी खालावली व बोअरसुद्धा आटत आल्यामुळे त्यांनी संत्र्याच्या १०० झाडांची तोडणी केली. त्यांनी दोन वर्षे संत्र्याचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतले. परंतु या आता निसर्गाच्या बदलामुळे त्यांचे फार मोठे नुकसान झाले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने या संत्र्याच्या झाडाला फळच राहिले नाही तर आता या झाडांना जगविण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळे या झाडांऐवजी जमीन रिकामी करून त्यामध्ये सोयाबीन किंवा इतर पीक घेतल्यास परवडेल असे या शेतकऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्यात गारपीट झाल्यामुळे आलेले संत्रे पडून नुकसान झाले. भांडेगाव परिसरात आहे. काही शेतकऱ्यांकडे तर तब्बल २५०० संत्र्यांची झाडे आहेत. परंतु सध्या झालेल्या निसर्गाच्या बदलामुळे संत्र्याची झाडे टिकवणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)भांडेगावात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या संत्र्याच्या बागा पाण्याअभावी यंदा धोक्यात आल्या आहेत.