शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा : राजरत्न आंबेडकर

By | Updated: November 28, 2020 04:06 IST

औरंगाबाद : राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा. शिक्षण संस्था काढा. आता आम्हाला राजकीय आरक्षणही नको. कारण ते ...

औरंगाबाद : राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा. शिक्षण संस्था काढा. आता आम्हाला राजकीय आरक्षणही नको. कारण ते देण्यामागचा हेतूच साध्य होताना दिसत नाही. आज आंबेडकरी समूहाला सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या लढाईची गरज आहे. यापुढे त्यावरच लक्ष केंद्रित करा, असा हितोपदेश गुरुवारी येथे राजरत्न आंबेडकर यांनी केला.

ते समता सैनिक दलाच्या, औरंगाबाद विभागाच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल येथे आयोजित संविधान गौरव दिन सोहळ्यात बोलत होते. सुभेदार मेजर बाजीराव सोनुने अध्यक्षस्थानी होते.

त्यांनी सांगितले, आता घरातल्या घरात पाहणे खूप झाले. मी कधीही पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे मागण्यांचे निवेदन घेऊन जात नाही. ११ राज्यांमध्ये माझे नेटवर्किंग आहे. अलीकडेच मी माझे गाऱ्हाणे यूएनकडे मांडून आलो. तिकडून नाक दाबले की, इकडे आपोआपच तोंड उघडले जाते.

संविधानाचे प्रत्येक पान रोज पाडलं जातंय. संविधानाच्या पहिल्या कलमापासून ते ३९५ व्या कलमापर्यंत रोज पायमल्ली होत आहे. संविधानाची ५० टक्के अंमलबजावणी केली गेली असती, तर हा देश समृद्ध आणि संपन्न झाला असता.

आज जगात अनेक देशांमध्ये संविधान दिन साजरा केला जातो; परंतु भारतात मात्र एकच समूह संविधान दिन साजरा करतो. एससीमधील बौद्ध समाजच हा दिन साजरा करतो. असे का व्हावे याबद्दल राजरत्न आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली.

प्राचार्य नामदेव सोनवणे, डॉ. सुधीर चक्रे, गणपती पाखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विलास शिरसाट, कारभारी त्रिभुवन, मंगल पगारे, रेखा राऊत, प्रवीण साळवे, भीमराव घोरपडे, शंकर म्हस्के आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.