शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, जयपूर,जोधपूरला औरंगाबादहून थेट विमानसेवा सुरू करा: भागवत कराड यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:03 IST

औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक ...

औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक येतात. तसेच जागतिक स्तरावरील बुद्धिस्ट केंद्र म्हणून विकसित होत असल्याने, मलेशिया, इंडोनिशिया, श्रीलंका, जपान, चीन यांसह अन्य बुद्धिस्ट देशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबाद जिल्ह्यात येतात. बुद्धिस्ट संस्कृतीचे अभ्यासकदेखील शहरात येत असल्याने त्यांना या विमानसेवेचा फायदा होणार आहे. सध्या आठवड्यात केवळ दोन दिवस एअर इंडियाचे विमान येतात, इतर विमान कंपन्यांची विमाने औरंगाबाद ते दिल्ली,औरंगाबाद ते मुंबईसाठी फुल्ल असतात, त्यामुळे एअर इंडियाने दिल्ली आणि मुंबई शहरासाठी विमान सेवा आणि फेऱ्या वाढवाव्यात, त्याचबरोबर नागपूर, पुणे, गोवा, जयपूर, जोधपूर या शहरातदेखील विमानसेवेचा विस्तार करण्याची मागणी केली.

औरंगाबाद विमानतळास २०१५ पासून कस्टमर एअर पोर्टचा दर्जा देण्यात आलेला होता. आता विमानतळावर स्वतंत्र टर्मिनल, प्रशस्त इमारत आणि इतर पायाभूत सुविधा लक्षात घेता खा. डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत विमान सुविधा वाढविण्याबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला.

शहरालगत पाच औद्योगिक वसाहती असून, औरंगाबाद जागतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विमान सेवेचा विस्तार होणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.