शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

१५ दिवसांत बांधकाम सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने शहरातील १६८ व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. आडत बाजारातील किराणा मार्केटमध्ये ...

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने शहरातील १६८ व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

आडत बाजारातील किराणा मार्केटमध्ये लीज डीडवर घेतलेल्या जागेत १५ दिवसात बांधकाम सुरू करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. मोंढ्यातील होलसेल व्यापाऱ्यांना बाजार समितीत किराणा मार्केटसाठी जागा देण्यात आली आहे. यात ३४० प्लॉट पाडण्यात आले. त्यातील सर्व प्लॉट विकण्यात आले आहेत. मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी येथील १५४ प्लॉट खरेदी केले. मात्र, जागेच्या किमतीवरून न्यायालयात वाद पोहचला आहे. यामुळे बाजार समितीने या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या नाहीत. पण, उर्वरित १८६ प्लॉट धारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, ज्यांना नोटिसा पाठविल्या आहेत त्यांचे दीड वर्षापूर्वी खरेदीखत झाले आहे. खरेदीखत केल्यापासून तीन वर्षांत बांधकाम करून प्रत्यक्ष व्यवहार सुरू करण्याची अट ठेवण्यात आली होती. मात्र, दीड वर्ष झाले. अजूनही त्या व्यापाऱ्यांनी बांधकामाचे डिझाईन मंजूर करून घेतलेले नाही. बांधकाम देखील चालू केले नाही.

चौकट

सर्वसाधारण सभेवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार

राज्य सरकारने जुलै २०२१ मध्ये बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमले आहे. या समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी २७ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येत आहे. मात्र, या प्रशासकीय मंडळावर एकाही व्यापारी प्रतिनिधीला घेतले नाही. याचा राग व्यक्त करण्यासाठी आडत व्यापारी, मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी वार्षिक सभेवर बहिष्कार घातला आहे.