शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

समाजासाठी व्यवस्थेविरूद्ध उभे राहा

By admin | Updated: October 25, 2015 23:59 IST

जालना : मातंग समाजाने राजकीय नेत्यांना आम्ही तुमचेच.. असे म्हणणे सोडून द्यावे, किती दिवस अशी भूमिका घेणार याचा विचार करून आपल्या प्रश्नासाठी व्यवस्थेविरूद्ध उभे राहाल,

जालना : मातंग समाजाने राजकीय नेत्यांना आम्ही तुमचेच.. असे म्हणणे सोडून द्यावे, किती दिवस अशी भूमिका घेणार याचा विचार करून आपल्या प्रश्नासाठी व्यवस्थेविरूद्ध उभे राहाल, तरच प्रश्न सुटतील, असे परखड मत अ‍ॅड. दयानंद भांगे यांनी व्यक्त केले.क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्यावतीने रविवारी मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित मांतग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्याचे उद्घाटन आ. अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे हे होते. तर आ. नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. नाडे, राजहंस मोरे, अशोक लोखंडे, गणेश भालेराव, विनोद आठवे, चतुरसिंग गोफणे, राजू खोजेकर, मच्छिंद्र कांबळे आदींची उपस्थिती होती. अ‍ॅड. भांगे म्हणाले, मातंग समाजाच्या विकासासाठी तत्कालीन सरकारने समाजाच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी क्रांतीगुरू लहुजी साळवे अभ्यास आयोग नेमला. या आयोगाने मूळ प्रश्न सोडून दुसऱ्याच प्रश्नाचा अभ्यास केला. आयोगाचे अध्यक्ष हे रमेश कदम होते. ज्यांनी समाजाच्या १०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून स्वत:चा विकास केला. तेव्हा समाजाचा विकास कसा होणार, असा सवाल करून ते म्हणाले की, राज्य घटनेत ५९ मागास जातीला आरक्षण दिलेले आहेत. त्या आरक्षणाची अंमलबंजावणी व्यवस्थित झाली असती तर नव्याने आरक्षण मागणीची वेळ आली नसती. म्हणून समन्यायी पद्धतीने समान आरक्षण वाटप करून ए.बी.सी अशी वर्गवारी करावी, अशी आमची मागणी आहे.समाजाच्या आरक्षण व अन्य प्रश्नासाठी जो पर्यंत व्यवस्थेविरूद्ध लढा उभारला जाणार नाही. तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाही. तेव्हा समाजातील सर्व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आ. अर्जुन खोतकर म्हणाले की, मातंग समाजाचे जे काही प्रश्न असतील ते हिवाळी अधिवेशनात मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजाला न्याय देण्याची आपली भूमिका राहणार असून यासाठी समाजाच्या पाठीशी आपली सर्व ताकद उभी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमात शाहीर अविनाश साळवे व त्यांच्या संचाने क्रांतीगुरू लहुजी साळवे, अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारीत गीतांतून समाज प्रबोधन केले. कार्यक्रमास जालना जिल्ह्यासह राज्यभरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.