शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

पाथरी महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या जागा भरल्या

By admin | Updated: June 6, 2014 01:02 IST

पाथरी: ग्रामीण भागातील जनतेचा महसूल विभाग कणा समजला जातो.

पाथरी: ग्रामीण भागातील जनतेचा महसूल विभाग कणा समजला जातो. मात्र महसूल विभागातील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे वेळेच्या आत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पाथरी तहसीलमध्ये कर्मचार्‍यांच्या रिक्तपदांनी तर उच्चांक गाठला होता. पाथरी येथे तीन नायब तहसीलदार व सहा पेशकार रुजू झाल्यामुळे महसूल विभागात कर्मचारी फुलफील झाले असून आता नागरिकांची कामे वेळेच्या आत मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.पाथरी तहसील कार्यालय गेल्या काही महिन्यांपासून कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. या ठिकाणी मागील काही वर्षे कायमस्वरुपी तहसीलदारांची पदे भरण्यात आली नव्हती. कित्येक वर्षे नायब तहसीलदारांकडे पदभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर येथील तहसीलदाराचे पद कायस्वरुपी भरण्यात आल्यानंतर कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांच्या रिक्त जागेबाबत मात्र महसूल प्रशासनाकडून कधी गांभीर्याने घेतले गेले नाही. सहा पेशकार आणि दोन नायब तहसीलदारांची पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त होती. पर्यायाने तहसील कार्यालयातील अनेक कामे खोळंबून पडली होती. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी येथील रिक्त कर्मचार्‍यांच्या बाबत तातडीने निर्णय घेत काही पेशकारांची रिक्त पदे आणि तीन नायब तहसीलदारांची पदे भरली आहेत. यामुळे कर्मचारी नाहीत, अशी ओरड करुन चालढकल करणार्‍या इतर कर्मचार्‍यांना आता जनतेची कामे करावी लागणार आहेत. महसूल विभागातील सर्वच कर्मचार्‍यांची पदे भरल्याने महसूल विभाग आता फुलफील झाला आहे. तर पदे भरल्याने नागरिकांना आता आपली कामे वेळेच्या आत पूर्ण होतील, अशी अपेक्षाही निर्माण होऊ लागली आहेत. (वार्ताहर)फाईल्स होत्या धूळखातसेतू सुविधा केंद्रामधून जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिक प्रस्ताव दाखल करीत असत. यासाठी पेशकाराची (अव्वल कारकून) स्वाक्षरी अनिवार्य असल्याने कार्यालयात पेशकार नसल्यामुळे अनेक वेळा फाईल्स धूळखात पडून राहत असत. पेशकार उपलब्ध नसल्याने तहसीलदारांचाही नाईलाज व्हायचा. मात्र आता नवीन पेशकारामुळे फाईल्स धूळखात पडून राहण्याची वेळ येणार नसल्याचे दिसते. एकाच अधिकार्‍याकडे अनेक पदभारमहसूल विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत असणार्‍या एकाच अधिकार्‍यांकडे अनेक विभागांचा पदभार देण्यात आला होता. यामुळे अनेक वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची आणि अतिरिक्त पदभार असल्यामुळे संबंधित अधिकारीही कामाचा बोजा अंगावर पडल्याने काम करण्यास टाळाटाळ करायचे. परंतु, आता कर्मचार्‍यांची पदे भरल्यामुळे अतिरिक्त पदभारही काढून घेण्यात आला आहे.