शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर

By admin | Updated: March 21, 2016 00:10 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मार्गातील वर्ग-२ जमिनींचा अडथळा अखेर दूर झाला आहे.

संजय तिपाले , बीडधाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगडावर रविवारी पार पडलेल्या नगद नारायण महाराज यांच्या द्विशताब्दीपूर्ती पुण्यतिथी सोहळा व महंत शिवाजी महाराज यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात राजकीय जुगलबंदीने रंगत भरली. आ. विनायक मेटे यांनी चौफेर टोलेबाजी केली, तर माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्या मिश्किल टिपण्णीने हास्याचे कारंजे उसळले. अध्यात्माच्या या व्यासपीठावर संत-महंतांबरोबरच राजकीय नेत्यांची गर्दी होती. हा दुर्मिळ योग साधून नेत्यांनी संतांपुढे आपले श्रेष्ठत्व दाखवितानाच आशीर्वादाची अपेक्षा केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी आ. राजेंद्र जगताप यांनी मी आमदार असताना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना गडावर आणले होते. त्यांनी गडावरून रायगड दिसतो, असे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार आले.त्यांनी मुंबई-दिल्ली दिसते, असे म्हटले होते. गडाची भक्ती करणाऱ्यांना नगद नारायण ‘नगद’ प्रसाद देतो. मेटे ताटकळले आहेत. त्यांना नक्कीच ‘आशीर्वाद’ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.खा. रजनी पाटील भाषणात म्हणाल्या, मला गडावरून दुष्काळात होरपळणारा माणूस दिसतो. आ. विनायक मेटे यांनी माजी आ. जगताप यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ‘मला विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला आशीर्वाद दिला असता तर बरे झाले असते, असे सूचक वक्तव्य केले. यावेळी हंशा पिकला. व्यासपीठावर राकाँचे केवळ जि.प. अध्यक्ष पंडित उपस्थित होते. त्याकडे लक्ष वेधत मेटे यांनी एकमेव विजयसिंह पंडित कार्यक्रमास हजर राहिल्याचा उल्लेख केला. मी व रजनी पाटील केजवरून गडावर येतो; पण गडाच्या जवळ असणारे वळून गडाला साधे पूजत नाहीत, असे सांगून त्यांनी क्षीरसागरांचा नामोल्लेख टाळत शरसंधान केले. गडावरून कोणाला मुंबई दिसते, तर कोणाला दिल्ली दिसते; पण मला समाज दिसतो, असे सूचक वक्तव्य करून मेटे यांनी नव्या राजकीय समीकरणाची गणिते मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते; परंतु न्यायालयात स्थगिती मिळविण्यासाठी जिल्ह्यातील काही ओबीसी नेत्यांनी खोडा घातला, असा टोलाही त्यांनी लगावला. भगवानगड, गोपीनाथगडावर लोक स्वत:हून येतात. कुणाच्या निमंत्राची गरज पडत नाही. ही श्रद्धा आपल्यात कधी येणार? असा सवाल त्यांनी विचारला. काही तत्त्व, धोरण मी पाळले आहेत, त्यात तडजोड नाही. राजकारण गेलं चुलीत, अशा रांगड्या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रणजित पाटील आले ते बरे झाले. आमचे काय व्हायचे ते होईल; पण मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे प्रमोशन होईल, अशी आशा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.