शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

स्पॉट अ‍ॅडमिशनचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:45 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ठेवलेल्या स्पॉट अ‍ॅडमिशनचा पूर्णपणे फज्जा उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ठेवलेल्या स्पॉट अ‍ॅडमिशनचा पूर्णपणे फज्जा उडाला. रिक्त जागा किती, प्रवेश किती झाले, कशाच्या आधारावर प्रवेश द्यायचे, याची कोणतीही नियमावली तयार नसाताना राज्यभरातून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावण्यात आले. दिवसभर शांतता बाळगलेल्या विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत सायंकाळी सात वाजेनंतर झाला. विधि, गणित आणि रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या दलानात प्रवेश करीत घोषणाबाजी केली. विद्यापीठात रात्री उशिरापर्यंत हजारो विद्यार्थी ठाण मांडून होते.विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला. यात सुरुवातीपासूनच नियोजनाचा अभाव असल्यामुळे स्पॉट अ‍ॅडमिशनच्या दिवशी सर्व विभागांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणीसाठी वेळ दिला होता. मात्र, प्रचंड प्रमाणात विद्यार्थी आल्यामुळे वेळेत नोंदणी झाली नाही. कागदपत्रे तपासणी, पडताळणी करून रात्री उशिरापर्यंत यादी लावण्यात अपयश आले. मराठवाड्याच्या कानाकोपºयातून विद्यार्थी आले होते. त्याच्या राहण्याची, परत जाण्याची आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दिवस मावळतीला लागताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली होती. गणित विभागात कोणतीच प्रक्रिया होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरूंचे दालन गाठत जाब विचारला. काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विधि विभागातही तशीच अवस्था झाली होती. पत्रकारिता विभागात उशिरापर्यंत यादीच लागली नाही. रसायनशास्त्र विभागात प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांची गर्दी होती. त्या ठिकाणी सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सकाळपासून दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली. रात्री ६ वाजता गुणवत्ता यादी लावली. त्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. माइकवर सूचना देण्यात येत होत्या. पोलिसांच्या गाड्या बोलावण्यात आल्या, तरीही विद्यार्थी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी गोंधळात वाढ झाली. विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. विभागावर दगडफेक सुरू केल्याचे विभागातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली राजभोज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या गोंधळानंतर तात्काळ विभागाच्या गेटला कुलूप लावण्यात आले होते. रसायनशास्त्र विभागप्रमुख विद्यापीठ प्रशासनाकडे अतिरिक्त मदत मागत असताना वेळेत ती पोहोचली नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियाच थांबविण्यात आली.