शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

सर्वपित्री संपताच उमेदवारीला उधाण

By admin | Updated: September 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या संपताच विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

औरंगाबाद : पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या संपताच विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शिवसेना- भाजपाची युती झाली असली तरी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदारांना उद्या २५ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी ९ वाजेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या सवाद्य मिरवणुकीतून उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळेल. इतर उमेदवारदेखील उद्याच अर्ज दाखल करणार आहेत. आज दिवसभर प्रत्येकाची मिरवणुका काढून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू होती. शिवसेनेकडून आ. प्रदीप जैस्वाल, एमआयएमकडून इम्तियाज जलील, पूनमचंद बमणे हे मध्य मतदारसंघातून तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे आ. संजय शिरसाट, एमआयएमकडून गंगाधर गाडे हे अर्ज भरणार आहेत. भाकपचे डॉ. भालचंद्र कांगो हे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.काही उमेदवारांनी सिनेअभिनेते, अभिनेत्रींना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. यामध्ये मराठी-हिंदीतील कलाकारांचा समावेश आहे.