शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या ३३ लघुसिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती मोहिमेला वेग

By admin | Updated: January 14, 2015 00:59 IST

व्यंकटेश वैष्णव; बीड जिल्ह्यातील जुन्या लघु सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असून यात ३३ जुन्या लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे

व्यंकटेश वैष्णव; बीडजिल्ह्यातील जुन्या लघु सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असून यात ३३ जुन्या लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी १६ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी येथे दिली. बेलगाव आणि कटवट या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असल्याचेही ते म्हणाले. जिल्हयात ९९ लघुसिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये २०८.०७ दलघमी पाणी साठण्याची क्षमता आहे. मात्र मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात अल्प पाऊस होत असल्याने लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा होणे देखील अवघड झालेले आहे. त्यातच लघु सिंचन प्रकल्पांची पडझड झालेली असल्यामुळे पाणी साठवून रहात नाही.सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नव्या सिंचन योजना सुरू करण्यासह जुन्या प्रकल्पांचीही दुरूस्ती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बेलगाव व कटवट सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती करण्यात आली असून दुरूस्तीसाठी मंजूर १६ कोटीपैकी तीन कोटींचा खर्च झाला आहे. ४बीड जिल्ह्यातील बहुतांश लघुसिंचन प्रकल्पांच्या सांडव्याचे बांधकाम तीस ते पस्तीस वषापूर्वी झालेले आहे. बांधकाम जुने झालेले असल्याने बहुतांश ठिकाणच्या सांडव्यांना तडे गेले आहेत. यामुळे या तलावांची पुर्नबांधणी केली तर शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ४ पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये उर्वरीत लघु प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये बीड, अंबाजोगाई, वडवणी, शिरूर कासार, पाटोदा आदी तालुक्यांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. दुरूस्ती का?४काही प्रकल्पांत गाळ साचलेला आहे, तर काही तलावांचे सांडवे तुटलेले आहेत तसेच अनेक बंधाऱ्यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी न साठता वाहून जात आहे. त्यामुळे दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांची तातडीने दुरूस्ती केली तर भविष्यात संबंधीत प्रकल्पात २०८.०७ दलघमी पाणी साठू शकतो. याचाच विचार करून शासनाने जुन्या सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे़ अडीच हजार दलघमी पाण्याची होणार बचत४लघु प्रकल्पाला गळती लागल्या मुळे पावसाळ्यात एका तलावातून अंदाजे ०.७५ दलघमी पाणी वाया जाते. दुरूस्तीमुळे ३३ प्रकल्पांमधील अडीच हजार दलघमीच्या जवळपास पाणी बचत होणार असल्याचे शासनाच्या अहवालात म्हटले आहे.