शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जुन्या ३३ लघुसिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती मोहिमेला वेग

By admin | Updated: January 14, 2015 00:59 IST

व्यंकटेश वैष्णव; बीड जिल्ह्यातील जुन्या लघु सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असून यात ३३ जुन्या लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे

व्यंकटेश वैष्णव; बीडजिल्ह्यातील जुन्या लघु सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असून यात ३३ जुन्या लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी १६ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी येथे दिली. बेलगाव आणि कटवट या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असल्याचेही ते म्हणाले. जिल्हयात ९९ लघुसिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये २०८.०७ दलघमी पाणी साठण्याची क्षमता आहे. मात्र मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात अल्प पाऊस होत असल्याने लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा होणे देखील अवघड झालेले आहे. त्यातच लघु सिंचन प्रकल्पांची पडझड झालेली असल्यामुळे पाणी साठवून रहात नाही.सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नव्या सिंचन योजना सुरू करण्यासह जुन्या प्रकल्पांचीही दुरूस्ती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बेलगाव व कटवट सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती करण्यात आली असून दुरूस्तीसाठी मंजूर १६ कोटीपैकी तीन कोटींचा खर्च झाला आहे. ४बीड जिल्ह्यातील बहुतांश लघुसिंचन प्रकल्पांच्या सांडव्याचे बांधकाम तीस ते पस्तीस वषापूर्वी झालेले आहे. बांधकाम जुने झालेले असल्याने बहुतांश ठिकाणच्या सांडव्यांना तडे गेले आहेत. यामुळे या तलावांची पुर्नबांधणी केली तर शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ४ पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये उर्वरीत लघु प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये बीड, अंबाजोगाई, वडवणी, शिरूर कासार, पाटोदा आदी तालुक्यांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. दुरूस्ती का?४काही प्रकल्पांत गाळ साचलेला आहे, तर काही तलावांचे सांडवे तुटलेले आहेत तसेच अनेक बंधाऱ्यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी न साठता वाहून जात आहे. त्यामुळे दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांची तातडीने दुरूस्ती केली तर भविष्यात संबंधीत प्रकल्पात २०८.०७ दलघमी पाणी साठू शकतो. याचाच विचार करून शासनाने जुन्या सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे़ अडीच हजार दलघमी पाण्याची होणार बचत४लघु प्रकल्पाला गळती लागल्या मुळे पावसाळ्यात एका तलावातून अंदाजे ०.७५ दलघमी पाणी वाया जाते. दुरूस्तीमुळे ३३ प्रकल्पांमधील अडीच हजार दलघमीच्या जवळपास पाणी बचत होणार असल्याचे शासनाच्या अहवालात म्हटले आहे.