शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अतिक्रमण हटावसाठी स्पेशल टास्क फोर्स

By admin | Updated: April 7, 2016 01:05 IST

औरंगाबाद : शहरातील अनेक नाल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लहान मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळायला तयार नाही.

औरंगाबाद : शहरातील अनेक नाल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लहान मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळायला तयार नाही. दरवर्षी पावसाळ्यात मनपाला मोठा त्रास सहन करावा लागतो. मनपातर्फे भूमिगत गटार योजनेचे कामही अनेक नाल्यांमधील अतिक्रमणांमुळे थांबले आहे. बुधवारी मनपा आयुक्तांनी झांबड इस्टेट ते भानुदासनगरपर्यंतच्या नाल्यांची पाहणी केली. नाल्यातील अतिक्रमणे पाहून आयुक्तांनी स्पेशल टास्क फोर्स तयार करून अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे यांनी झांबड इस्टेट ते भानुदासनगर या अडीच किलोमीटर लांब नाल्याची पाहणी केली. या नाल्यातून मनपाला भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकायचे आहेत. मागील दोन महिन्यांपासून काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. नाल्यातील अतिक्रमणे हटविल्याशिवाय पाईप टाकणे अशक्यप्राय आहे. नाल्यात १५ ते २० जणांनी पक्के बांधकाम केले आहे. शहरातील इतर नाल्यांवरही अशाच पद्धतीची अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांची संख्या जवळपास २०० पेक्षा जास्त आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल टास्क फोर्स नेमण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. या पथकाने नाल्यातील अतिक्रमणे त्वरित काढावीत, असेही बकोरिया यांनी आदेशित केले. दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असून, त्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्यात यावा, तसेच अतिक्रमणे हटवून काम करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक नितीन साळवी, नगरसेविका अंकिता विधाते, उपायुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, उपअभियंता वसंत निकम यांच्यासह खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.