शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

अतिक्रमण हटावसाठी स्पेशल टास्क फोर्स

By admin | Updated: April 7, 2016 01:05 IST

औरंगाबाद : शहरातील अनेक नाल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लहान मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळायला तयार नाही.

औरंगाबाद : शहरातील अनेक नाल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लहान मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळायला तयार नाही. दरवर्षी पावसाळ्यात मनपाला मोठा त्रास सहन करावा लागतो. मनपातर्फे भूमिगत गटार योजनेचे कामही अनेक नाल्यांमधील अतिक्रमणांमुळे थांबले आहे. बुधवारी मनपा आयुक्तांनी झांबड इस्टेट ते भानुदासनगरपर्यंतच्या नाल्यांची पाहणी केली. नाल्यातील अतिक्रमणे पाहून आयुक्तांनी स्पेशल टास्क फोर्स तयार करून अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे यांनी झांबड इस्टेट ते भानुदासनगर या अडीच किलोमीटर लांब नाल्याची पाहणी केली. या नाल्यातून मनपाला भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकायचे आहेत. मागील दोन महिन्यांपासून काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. नाल्यातील अतिक्रमणे हटविल्याशिवाय पाईप टाकणे अशक्यप्राय आहे. नाल्यात १५ ते २० जणांनी पक्के बांधकाम केले आहे. शहरातील इतर नाल्यांवरही अशाच पद्धतीची अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणांची संख्या जवळपास २०० पेक्षा जास्त आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल टास्क फोर्स नेमण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. या पथकाने नाल्यातील अतिक्रमणे त्वरित काढावीत, असेही बकोरिया यांनी आदेशित केले. दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असून, त्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्यात यावा, तसेच अतिक्रमणे हटवून काम करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक नितीन साळवी, नगरसेविका अंकिता विधाते, उपायुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, उपअभियंता वसंत निकम यांच्यासह खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.