शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या रेल्वे कामांसाठी ‘विशेष प्रकल्प’

By admin | Updated: March 15, 2016 00:44 IST

औरंगाबाद : रेल्वेचे अनेक प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून रखडले आहेत. अशा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘दमरे’ने विशेष प्रकल्प (आयडेंटिफिकेशन प्रोजेक्ट) हाती घेतले आहेत

औरंगाबाद : रेल्वेचे अनेक प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून रखडले आहेत. अशा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘दमरे’ने विशेष प्रकल्प (आयडेंटिफिकेशन प्रोजेक्ट) हाती घेतले आहेत. यामध्ये दोन ते तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची यादी तयार केली जात आहे. यानुसार २०१६-१७ या वर्षासाठी यादी तयार केली आहे. मुदखेड-परभणी मार्गाचे दुहेरीकरण, अकोला-खंडवा हा मार्ग ब्रॉडगेज करणे आदी प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश असून, तो लवकरच पूर्ण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता म्हणाले.औरंगाबाद रेल्वेस्टेशनची सोमवारी पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आजघडीला नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही आठवड्यातून दोन दिवस धावते. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता ही रेल्वे नियमित करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. याविषयी बोलताना गुप्ता म्हणाले, सध्या रेल्वे प्रशासन पुण्यासाठी नियमित रेल्वे चालविण्यासंदर्भात विचार करीत आहे. सकाळी नांदेड येथून निघून मनमाडमार्गे पुण्याला सायंकाळी पोहोचणारी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मनमाड रेल्वेस्टेशनवर अजिंठा एक्स्प्रेस ९ तास थांबते. त्यामुळे ही रेल्वे मुंबईपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. नगरसोल येथे थांबणारी डेमू रेल्वेही मनमाडपर्यंत नेण्याची प्रतीक्षा आहे. याविषयी काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले.रेल्वेस्टेशन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मनपाकडून रेल्वेच्या जागेची मागणी केली जात आहे. त्यासाठी त्यांनी (पान २ वर)३० हजार कोटी रुपये नुकसान सहन करून भारतीय रेल्वे सेवा देत आहे. रेल्वे कामांसाठी रेल्वेकडे पैसा नाही. त्यामुळे राज्य सरकार, भागीदार आणि रेल्वे बोर्ड यांच्या संयुक्त माध्यमातून गुंतवणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ४या कार्यक्रमातून रेल्वेची कामे वेगाने होतील, असे गुप्ता म्हणाले. औरंगाबादला पीटलाईन मंजूर नाही व त्यासाठी कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.