शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कृषी संस्कृतीमध्ये पोळ्याला विशेष महत्व

By admin | Updated: August 24, 2014 23:53 IST

हिंगोली : पोळ्याच्या सणाला भारतीय कृषी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे.

हिंगोली : पोळ्याच्या सणाला भारतीय कृषी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. आदल्यादिवशी वर्षभर कबाड कष्ट करून थकलेल्या बैलांच्या खांदेमळण्यासाठी विशेष पाच पाणी पळसाची पाने असलेला ‘देठवा’ म्हणून वापरतात. त्याने वर्षभर केलेल्या काम केलेल्या बैलाचा थकवा नाहीसा होवून त्यांचा उल्हास वाढतो यामुळे त्यांची पुजा केली जाते. बैलांसाठी लागणारे कासरे, दोरीसाठी पळस वृक्षापासून तयार केलेल्या दोरीचा सर्रास उपयोग केला जातो. औजारांसाठी लागणाऱ्या शिवळा सुद्धा पुर्वी पळसाच्या उपयोग केला जात होता. त्यामुळे पळसाच्याच्या झाडांच्या फांद्याची पोळ्याच्या दिवशी मेढ म्हणून प्रवेशद्वार, मंदिरामध्ये ठेवून पुजा केली जाते. पळसाच्या मुळांपासून ताग व दोर, पानापासून द्रोण व पत्रावळी, फुलापासून रंग, पळस पापडी, त्वचा रोग औषधी उपयोगी, फुल- मुत्रविकार, डिंक - शक्तीवर्धक उपयोग, पळसाच्या झाडांवर उन्हाळ्यात सुंदर फुले येतात त्यामुळे पक्ष्यांद्वारे परागीकरण होते, आदींसाठी पळसाचा उपयोग होतो. अशा प्रकारे मानव, बैल व पळस वृक्षांचा संबध असल्यामुळे पळस हा कलीयुगाचा कल्पवृक्ष म्हणून गणला जातो. म्हणूनच पोळा सणाच्या दिवशी सकाळीच पळसाच्या फांद्या (मेढ) मुख्य प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजुला ठेवून पुजन केले जाते. परंतु सद्या आपल्या प्रदेशात पळस वृक्ष कमी असल्यामुळे अशा प्रकारे फांद्या तोडून पुजन करण्याऐवजी प्रतिकात्मक एक पान ठेवून पुजन करावे व पळस वृक्षाची तोड थांबवून पर्यावरणास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)यंदा पोळ्याचा सण उसणवारीवरच भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील सााटंबा येथे पोळ्याच्या सणानिमित्त वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा-राजाची गावातील मानकऱ्यांच्या हस्ते पुजा करून मंगलाष्टके म्हणून पोळ्याला सुरूवात केली जाते. शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजा आणि बळीराजाचाही पोळा हा अतिमहत्वाचा सण असल्याने दोघेही उल्हासाने या सणाची वाट पाहतात. परंतु पाऊस नसल्याने हा सण उसणवारीवरच साजरा करावा लागत आहे. पोळा हा सण उसणवारीवर का होईना पण चांगल्या प्रकारे साजरा केला जात असल्याचे चित्र आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना धुवून बेगड लावली जाते. फुगे, घागरमाळा, झुल आदी प्रकारच्या साहित्याने सजवून बैलांना हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून दर्शनास आणल्या जाते. त्यानंतर गावातील मानकऱ्यांच्या हस्ते त्यांची पूजा केल्या जाते. त्या ठिकाणी अगदी लग्न समारंभाप्रमाणे सजवलेल्या मंडपात उभे करून पाच मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकल्या जातात. त्यामुळे या दिवसाला एका लग्नसमारंभासारखेच महत्व प्राप्त होते. पाच मंगलाष्टक झाल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीनंतर समोर भजनी मंडळीसह बैलांची प्रत्येक घरी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य चारल्या जातो. अशा प्रकारे बैलांसह गावातून पाच फेऱ्या मारल्या जातात. यावर्षी साटंबा येथे विनाबंदोबस्त पोळा साजरा करण्याचा संकल्प महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सीताराम घ्यार यांनी केला आहे.(वार्ताहर)