शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

‘‘एसपीए’ही पळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:01 IST

देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था उभारण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आता एसपीए ही नावाजलेली संस्था पुण्याला पळवून नेण्यात आली आहे.मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: औरंगाबादेत एसपीए संस्थेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, तो मंजूरही झाल्याचे नमूद केले होते. स्थानिक आर्किटेक्ट संघटनेने केंद्रात चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव औरंगाबादसाठी मंजूर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून’ या मथळ्याखाली १४ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना एसपीए ही संस्था पुण्याला आणण्यासंदर्भात पत्र दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्कूल आॅफ प्लॅनिंगची मागणी औरंगाबादकरांनी केली नव्हती.तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने आयआयएम या संस्थांसाठी विविध शहरांची निवड सुरू केली होती. तेव्हा देशातील सर्वोच्च शिखर संस्था मराठवाड्याच्या राजधानीत यावी म्हणून जनआंदोलन उभे करण्यात आले. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, व्यापाºयांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा केला होता. एवढ्यानंतरही युती शासनाने मराठवाड्यावर अन्याय केला. आयआयएम ही संस्था चक्क नागपूरला पळवून नेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: औरंगाबादला दुय्यम दर्जाची एसपीए ही संस्था मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांनीही एक मोठी संस्था औरंगाबादला येणार असल्याने समाधान व्यक्त केले.मागील तीन वर्षांमध्ये संस्था स्थापन करण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबादची एसपीए ही संस्थाही पुण्याला पळविण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिकाकेंद्र शासनाने मागील आठवड्यात एसपीए औरंगाबादला मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्री ही संस्था पुण्याला स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र देतात. ही दुटप्पी भूमिका नाही तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल स्थानिक आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थित केला.माझी प्रामाणिक इच्छास्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्कि टेक्ट’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट’ ही संस्था पुण्याला होणार असल्याच्या बातम्या शनिवारी प्रसिद्ध झाल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले की, एसपीए ही संस्था औरंगाबादला स्थापन व्हावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.