शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘‘एसपीए’ही पळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:01 IST

देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था उभारण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आता एसपीए ही नावाजलेली संस्था पुण्याला पळवून नेण्यात आली आहे.मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: औरंगाबादेत एसपीए संस्थेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, तो मंजूरही झाल्याचे नमूद केले होते. स्थानिक आर्किटेक्ट संघटनेने केंद्रात चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव औरंगाबादसाठी मंजूर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून’ या मथळ्याखाली १४ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना एसपीए ही संस्था पुण्याला आणण्यासंदर्भात पत्र दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्कूल आॅफ प्लॅनिंगची मागणी औरंगाबादकरांनी केली नव्हती.तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने आयआयएम या संस्थांसाठी विविध शहरांची निवड सुरू केली होती. तेव्हा देशातील सर्वोच्च शिखर संस्था मराठवाड्याच्या राजधानीत यावी म्हणून जनआंदोलन उभे करण्यात आले. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, व्यापाºयांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा केला होता. एवढ्यानंतरही युती शासनाने मराठवाड्यावर अन्याय केला. आयआयएम ही संस्था चक्क नागपूरला पळवून नेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: औरंगाबादला दुय्यम दर्जाची एसपीए ही संस्था मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांनीही एक मोठी संस्था औरंगाबादला येणार असल्याने समाधान व्यक्त केले.मागील तीन वर्षांमध्ये संस्था स्थापन करण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबादची एसपीए ही संस्थाही पुण्याला पळविण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिकाकेंद्र शासनाने मागील आठवड्यात एसपीए औरंगाबादला मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्री ही संस्था पुण्याला स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र देतात. ही दुटप्पी भूमिका नाही तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल स्थानिक आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थित केला.माझी प्रामाणिक इच्छास्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्कि टेक्ट’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट’ ही संस्था पुण्याला होणार असल्याच्या बातम्या शनिवारी प्रसिद्ध झाल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले की, एसपीए ही संस्था औरंगाबादला स्थापन व्हावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.