शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘‘एसपीए’ही पळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:01 IST

देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था उभारण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आता एसपीए ही नावाजलेली संस्था पुण्याला पळवून नेण्यात आली आहे.मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: औरंगाबादेत एसपीए संस्थेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, तो मंजूरही झाल्याचे नमूद केले होते. स्थानिक आर्किटेक्ट संघटनेने केंद्रात चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव औरंगाबादसाठी मंजूर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून’ या मथळ्याखाली १४ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना एसपीए ही संस्था पुण्याला आणण्यासंदर्भात पत्र दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्कूल आॅफ प्लॅनिंगची मागणी औरंगाबादकरांनी केली नव्हती.तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने आयआयएम या संस्थांसाठी विविध शहरांची निवड सुरू केली होती. तेव्हा देशातील सर्वोच्च शिखर संस्था मराठवाड्याच्या राजधानीत यावी म्हणून जनआंदोलन उभे करण्यात आले. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, व्यापाºयांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा केला होता. एवढ्यानंतरही युती शासनाने मराठवाड्यावर अन्याय केला. आयआयएम ही संस्था चक्क नागपूरला पळवून नेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: औरंगाबादला दुय्यम दर्जाची एसपीए ही संस्था मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांनीही एक मोठी संस्था औरंगाबादला येणार असल्याने समाधान व्यक्त केले.मागील तीन वर्षांमध्ये संस्था स्थापन करण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबादची एसपीए ही संस्थाही पुण्याला पळविण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिकाकेंद्र शासनाने मागील आठवड्यात एसपीए औरंगाबादला मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्री ही संस्था पुण्याला स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र देतात. ही दुटप्पी भूमिका नाही तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल स्थानिक आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थित केला.माझी प्रामाणिक इच्छास्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्कि टेक्ट’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट’ ही संस्था पुण्याला होणार असल्याच्या बातम्या शनिवारी प्रसिद्ध झाल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले की, एसपीए ही संस्था औरंगाबादला स्थापन व्हावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.