शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

सोयाबिन बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण

By admin | Updated: November 15, 2014 23:56 IST

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाभरातून अशा २१६ तक्रारी दाखल झाल्याने सोयाबिनच्या बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचीच स्थिती आहे.यावर्षी निसर्गाने अवकृपा केली. त्यामुळे जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय नाजूक आहे. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम धोक्यात आल्याने पिकांचे थोडेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. कापूस आणि सोयाबिन ही जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. परंतु या दोन्ही पिकांचा उतारा अत्यल्प निघाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात गुरफटला आहे. निसर्गाच्या या संकटासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मानव निर्मित संकटाचाही सामना करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा सोयाबिनकडे कल वाढला आहे. कापसाकडे पांढरे सोने म्हणून पाहिले जात असले तरी सोयाबिनचे पीक नगदी पिक म्हणून पुढे येत आहे. त्यातूनच सोयाबिनचा पेरा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला. बहुतांश शेतकऱ्यांचा कल सोयाबिनकडे झाला आहे. सोयाबिनसारख्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन इतर पिकाची कसर या पिकात काढली जाते. त्यामुळे सोयाबिनचे बियाणे घेताना शेतकरी सहसा तडजोड करीत नाही. चांगल्या कंपनीचे बियाणे जास्त पैसे मोजूनही तो खरेदी करतो. यावर्षी सोयाबिनच्या बियाणांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी कंपनीचे बियाणे विकत घेतले. परंतु हे बियाणे मात्र उगवले नसल्याचेच आता समोर येत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सोयाबिन बियाणे उगवले नसल्याच्या २१६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रार करणाऱ्यांच्या सोयाबिन बॅगची संख्या तब्बल ६०४ एवढी आहे. २४१.६ हेक्टरवरील सोयाबिन उगवण शक्ती कमी झाल्याने धोक्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबिनच्या बियाणांना ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. गंगाखेड तालुक्यातून सोयाबिन बियाणांविषयी सर्वाधिक ५३ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. मानवत तालुक्यातील केवळ चार तक्रारी आहेत. जिल्ह्यात सरासरी २ पोत्याचा उतारा सोयाबिनला आला आहे. परंतु या २१६ तक्रारकर्त्यांचे मात्र बियाणेच उगवले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही. त्यामुळे सोयाबिन पिकासाठी केलेल्या खर्चावर पाणी सोडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाने या सर्व तक्रारींचे पंचनामे केले असून, हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. परंतु त्यातून शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते, हाही प्रश्नच आहे.जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे़ शेतीतून उत्पन्न मिळाले नसल्याने वर्षभराचे आर्थिक गणित जुळविण्यात गुंतला आहे़ (प्रतिनिधी)