शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोयाबिन बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण

By admin | Updated: November 15, 2014 23:56 IST

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाभरातून अशा २१६ तक्रारी दाखल झाल्याने सोयाबिनच्या बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचीच स्थिती आहे.यावर्षी निसर्गाने अवकृपा केली. त्यामुळे जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय नाजूक आहे. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम धोक्यात आल्याने पिकांचे थोडेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. कापूस आणि सोयाबिन ही जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. परंतु या दोन्ही पिकांचा उतारा अत्यल्प निघाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात गुरफटला आहे. निसर्गाच्या या संकटासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मानव निर्मित संकटाचाही सामना करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा सोयाबिनकडे कल वाढला आहे. कापसाकडे पांढरे सोने म्हणून पाहिले जात असले तरी सोयाबिनचे पीक नगदी पिक म्हणून पुढे येत आहे. त्यातूनच सोयाबिनचा पेरा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला. बहुतांश शेतकऱ्यांचा कल सोयाबिनकडे झाला आहे. सोयाबिनसारख्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन इतर पिकाची कसर या पिकात काढली जाते. त्यामुळे सोयाबिनचे बियाणे घेताना शेतकरी सहसा तडजोड करीत नाही. चांगल्या कंपनीचे बियाणे जास्त पैसे मोजूनही तो खरेदी करतो. यावर्षी सोयाबिनच्या बियाणांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी कंपनीचे बियाणे विकत घेतले. परंतु हे बियाणे मात्र उगवले नसल्याचेच आता समोर येत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सोयाबिन बियाणे उगवले नसल्याच्या २१६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रार करणाऱ्यांच्या सोयाबिन बॅगची संख्या तब्बल ६०४ एवढी आहे. २४१.६ हेक्टरवरील सोयाबिन उगवण शक्ती कमी झाल्याने धोक्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबिनच्या बियाणांना ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. गंगाखेड तालुक्यातून सोयाबिन बियाणांविषयी सर्वाधिक ५३ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. मानवत तालुक्यातील केवळ चार तक्रारी आहेत. जिल्ह्यात सरासरी २ पोत्याचा उतारा सोयाबिनला आला आहे. परंतु या २१६ तक्रारकर्त्यांचे मात्र बियाणेच उगवले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही. त्यामुळे सोयाबिन पिकासाठी केलेल्या खर्चावर पाणी सोडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाने या सर्व तक्रारींचे पंचनामे केले असून, हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. परंतु त्यातून शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते, हाही प्रश्नच आहे.जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे़ शेतीतून उत्पन्न मिळाले नसल्याने वर्षभराचे आर्थिक गणित जुळविण्यात गुंतला आहे़ (प्रतिनिधी)